शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

अटल भूजल योजनेंतर्गत सिन्नर तालुक्याला होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:26 IST

सिन्नर : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींचा अटल भूजल योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार ...

सिन्नर : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींचा अटल भूजल योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार असून, भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी या योजेनतून कामे केली जाणार असल्याने सिन्नर तालुक्याची भूजलपातळी वाढीस याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्याचा लवकरच कायापालट होण्यास हातभार लागणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजलपातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी अटल भूजल योजना (राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प) केंद्रातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व देवळा या दोन तालुक्यांमधील ११६ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. यात सिन्नर तालुक्यातील ८७ तर देवळा तालुक्यातील ४२ गावांचा समावेश असल्याने या दोन्ही तालुक्यांतील ९ पाणलोट क्षेत्रात कृषी विभागामार्फत भूजलपातळी वाढीसाठी योजना राबविण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

भूजलासंबंधित माहिती व अहवाल जनसामान्यांकरिता खुले करण्यासाठी ७३.८३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्याची भूजलपातळी खालावल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या योजनेअंतर्गत विहिरींची भूजलपातळीची अद्ययावत माहिती ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्या भागाची भूजलपातळी खोल गेलेली आहे. अशा भागात पिझोमीटर (विंधन विहीर) करण्यात येणार आहे.

याशिवाय लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडे तयार करण्याकामी ११०.७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन या योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्रथम जलअर्थसंकल्प तयार करण्यात येणार आहे. गावनिहाय जलसुरक्षा आराखडे तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती तसेच संबंधित गावाची लोकसंख्या, पशुधन, सिंचन विहिरी, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, पीक पद्धती आदी मार्गांनी होणारे भूजल पुनर्भरण आणि उपसा आदींबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. या योजनेच्या नियोजनानुसार पहिल्या दोन वर्षातं सर्व कामे केली जाणार असून, निर्देशांकांची पूर्तता केल्यावर या निर्देशानुसार ११०.७४ कोटींचे प्रोत्साहन अर्थसाहाय प्राप्त होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

जलसंधारण, कृषी, लघु पाटबंधारे, ग्रामविकास आदी विभागांच्या सहभागातून योजनेची अंमलबजावणी होणार आहे. प्रत्येक वर्षातील कामांची आखणी करताना ‘अटल योजनेवरील’ विशेष कामांची नोंद केली जाणार आहे. यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरविभागीय सुकाणू समिती नेमण्यात येणार आहे. जलसुरक्षा आराखड्यामध्ये मान्यताप्राप्त झालेल्या उपाययोजनांची, सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या किंवा नवीन केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांची एक केंद्राभिमुख करण्यासाठी १४७.६४ कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही खासदार गोडसे यांनी नमूद केले.

सिन्नर तालुक्यातील समाविष्ट गावे

आडवाडी, आगासखिंड, अटकवाडे, औंधेवाडी, बोरगाव पिंपरी, भाटवाडी, भोकानी, बोरखिंड, चंद्रपूर, चंद्रपूर (खापराळे), चोंधी, दहीवाडी, दापूर, दातली, दातली (केदापूर), दातली (शहापूर), दत्तनगर, देवपूर, धोंडबार, धोंडवीरनगर, दोडी खुर्द, डोणवडे, दुबेरे, दुशिंगापूर, फरदापूर, घोरवाड, घोटेवाडी, गोंडे, गुळवंच, हरसुले, हिवरगाव, जामगाव, करवाडी, केरुपाटीलनगर, खडांगळी, खंबाळे, खोपडी बुद्रुक, कीर्तांगळी, कीर्तांगळी (एकलहरे), कोमलवाडी, कोनांबे, कृष्णानगर, कुंडेवाडी, कुंडेवाडी, लोणारवाडी, मालधोन, मालेगाव, मालेगाव (मापारवाडी), मानेगाव, मेंदी, मुसळगाव, मुसळगाव (गुरेवाडी), नाणेगाव, निमगाव देवूपर, पांचाळे, पांढुर्ली, पोस्टे, पठारे बुद्रूक, पठारे खुर्द, पाटोळे, पाटपिंपरी, पिंपळगाव, फुटाळेवाडी, राहुरी, रामनगर, सांगवी, सदरवाडी, सावतामाळीनगर, सायले, शिवगा दारणा, शिवडे, शिवाजीनगर, श्रीरामपूर, सोमठाणे, सोनांबे, सोनारी, संदूरपूर, उजनी, वडगाव पिंगळा, वडांगळी, विधानवाडी, विंचूर दळवी, वडगाव, वारेगाव या गावांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

सिन्नर व देवळा तालुक्याचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत भूजलपातळी वाढीसाठी व्यवस्थापनासाठी योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ९ पाणलोट क्षेत्रातही काम होणार असून, या योजनेमुळे विकासाला हातभार लागणार आहे.

- खासदार हेमंत गोडसे, नाशिक