शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यामुळे रस्त्याची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:30 IST

शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे.

ठळक मुद्देविठोबा चौकातील प्रकार : दुरूस्तीकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. परिणामी, अपघातात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यात अनेकांना गंभीर दुखापती होत आहे. असे असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.विठोबा चौकाकडून नागपूरकडे जाणाºया अत्यंत गजबजलेला तथा वाहतुकीचा रस्ता शहरात प्रवेश करतो. फीदा हुसैन पेट्रोल पंपकडून विठोबा चौकाकडे येताना प्रस्तूत प्रतिनिधीने खड्ड्यांची प्रत्यक्ष गणनाच केली. यात खड्डे विठोबा चौक ते पेट्रोलपंप दरम्यान रस्त्यावर लहान-मोठे ११३ खड्डे दिसून आले. या रस्त्याची दर्जेदार दुरूस्ती करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगर परिषद प्रशासनाने अद्याप दाखविली नाही. शहरातील अनेक नागरिकांनी मागणी करूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पाऊस आल्यास या खड्ड्यांमध्ये पाणी भरत असून दुचाकी धारकांची फटफजीती होते. खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. विशेषत: महिला व वृद्ध दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य मार्गावर इतके अधिक खड्डे आहे की, रस्ताच खड्ड्यात गेल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. खड्डे चुकवून चालण्याच्या नादात अपघात होतात. या रस्त्याचे नव्याने बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. असे असले तरी तोपर्यंत तात्पूरती दुरूस्ती करून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.मुरूमावरून वाहने घसरून होत आहेत अपघाततुकडोजी चौक ते विठोबा चौक दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांत मुरूम टाकण्यात आला आहे. यात दगडच अधिक असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहे. खड्डे भरताना मुरूम पे्रसही करण्यात आलेला नाही. यापुर्वी हेच खड्डे गिट्टीच्या बारीक चुरीने बुजविण्यात आले होते; पण पहिल्याच पावसातच चुरी वाहून गेली. यानंतर थोडी जाड चुरी खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आली; पण ती निरुपयोगी ठरली आहे. खड्डे मात्र जैसे थे झाले आहेत.आता पालिकेने तिसरा प्रयोग म्हणून मुरूम व दगडाने खड्डे बुजविले आहे. त्या मुरूमाच्या दगडांवरून वाहने घसरून अपघात होत आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. शिवाय रस्त्यांची अवस्था पाहून पालिकेवर रोष व्यक्त करीत आहेत. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.