शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

व्यावसायिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:52 IST

प्रवीण दोशी । वणी : सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव काळात भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारा व्यापारीवर्ग चिंतामग्न झाला असून, किराणा, हॉटेल्स, पूजेचे साहित्य, प्रसाद व तत्सम व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. कर्ज काढून व्यवसायात गुंतवणूक करणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

सप्तशृंगगड : भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याचा परिणाम

प्रवीण दोशी ।

वणी : सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव काळात भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारा व्यापारीवर्ग चिंतामग्न झाला असून, किराणा, हॉटेल्स, पूजेचे साहित्य, प्रसाद व तत्सम व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. कर्ज काढून व्यवसायात गुंतवणूक करणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.सप्तशृंगगडावर सुमारे ३०० व्यावसायिक विविध प्रकारचे व्यवसाय करतात. यात किराणा, प्रसाद, पूजेचे साहित्य, खेळणी, पादत्राणे, साडी-चोळी, पैठणी, पेढे विक्रेते यांबरोबरच फोटो, विविध रंगांचे दोरे व तत्सम व्यावसायिक व किमान ५० खासगी हॉटेल्स व्यावसायिक नाश्ता-जेवणाबरोबर निवास व्यवस्थाही उपलब्ध करून देतात. उत्सवकाळात हे व्यावसायिक मोठी गुंतवणूक करतात. चैत्र यात्रोत्सव व नवरात्रोत्सव असे दोन उत्सव गडावर मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. उत्सवाचे स्वरूप व्यापक असल्यामुळे देशभरातील भाविक हजारोंच्या संख्येने गडावर हजेरी लावतात. स्वाभाविकत: भाविकांच्या हजेरीमुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. चैत्रोत्सवापेक्षा नवरात्रोत्सवात भाविकांच्या गर्दीचा उच्चांक असतो. नेहमीप्रमाणे भाविक गडावर येतील व खरेदी करतील या हेतूने आम्ही केलेली गुंतवणूकही अंगावर पडली असून, भाविकांची संख्या रोडावल्याने घाऊक विक्रे त्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे करायचे काय, असा प्रश्न उभा राहिल्याची माहिती व्यावसायिक ईश्वर कदम यांनी दिली.बॅँकांचे कर्ज अन् हातउसनवारीपंढरपूर येथून कुंकू, मालेगाव व धुळे येथून साड्या, नाशिक येथून पूजासाहित्य व प्रसाद, उस्मानाबाद जिल्ह्यातून पेढे, आंध्र प्रदेशातून आडत्यांच्या माध्यमातून नारळ व ठिकठिकाणांहून तत्सम खरेदीचे नियोजन व्यापारी आखतात. पैसे आगाऊ द्यावे लागतात. तद्नंतर माल देण्यात येतो. बँकांचे कर्ज व नातेगोते आणि परिचितांकडून हातउसनवार करून भांडवल उभे करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. मालाची विक्र ी अपेक्षित व समाधानकारक नाही व त्यामुळे चलन फिरले नाही. अशा स्थितीत गाडी रुळावर आणण्याचे आव्हान व्यावसायिकांसमोर आहे. दरम्यान, गुरुवारच्या कोजागरी पौर्णिमेकडे व्यावसायिकांचे आता लक्ष लागले आहे. परंतु यादिवशी कावडधारकांची गर्दी होत असल्याने तुलनात्मक भाविकवर्ग गडावर येत नाही. जे येतात ते दर्शन करून परततात. त्यामुळे या प्रणालीतही असमान स्थितीवर नियंत्रण आणणे आव्हानात्मक काम आहे.