शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सणादिवशी सख्ख्या भावांना का संपवलं?; नाशिकमधील दुहेरी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले, कारण समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:27 IST

ज्या टोळक्याने दोघा भावांना संपवले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nashik Double Murder Case : रंगपंचमीच्या सणादिवशी नाशिक शहर दुहेरी हत्या प्रकरणाने हादरले होते. दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून पूर्ववैमनस्यातून वचपा काढायचा आणि वर्चस्ववाद टिकवून ठेवण्यासाठी जाधव बंधूंना टोळक्याने संपवले, असं पोलिस तपासात प्रथमदर्शनी समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अवघ्या सहा तासांत या दुहेरी खुनातील पाचही आरोपींना हेरून बेड्या ठोकल्या. 

नाशिक शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरुच आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी सिडकोमध्ये एकाचा खून झाला. त्या घटनेला पाच दिवस होत नाही तोच पुन्हा रंगपंचमीच्या उत्साहाचा शेवट थेट दुहेरी हत्याकांडाने झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडल्याची चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. संशयित आरोपी सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश ऊर्फ सोनू उशिरे या हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. मृत्युमुखी पडलेल्या जाधव बंधूंपैकी उमेश ऊर्फ मन्ना जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते, असेही बोलले जात आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. ज्या टोळक्याने दोघा भावांना संपविले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे उपनगर पोलिसांपुढे टाकळीरोड, बोधलेनगर, आंबेडकरवाडी, जय भवानी रोड, जेलरोड या भागातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

शेजारी बनले वैरीमुख्य संशयित आरोपी अनिल रेडेकर, सचिन रेडेकर हे मयत जाधव बंधूंच्या शेजारीच राहायला होते. दुहेरी खुनातील हल्लेखोरांमध्ये हे मुख्य संशयित हल्लेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यांच्यामध्ये जुने वाद होते. या वादातून व परिसरात कोणाचे वर्चस्व कायम ठेवायचे यावरून हा हल्ला झाला. रंगपंचमी खेळून संशयित रेडेकर हे घरी जात असताना रस्त्यात त्यांचा शाब्दिक वाद जाधव बंधूंसोबत झाला. या वादानंतर टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढविल्याचे समोर आले आहे.

खंडणी मागणीचीही घटनेला किनारदुहेरी खुनाच्या घटनेला वर्चस्ववादासह खंडणी मागणीचीही किनार असल्याचे दिसत आहे. दोघांकडून ५० हजारांचा हप्ता मागितला जात होता. यामुळे जाधव यांच्याविरोधात तक्रार दिल्याने त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच टोळक्यापैकी सागर गरड याच्यावर अमली पदार्थविक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस