शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

सणादिवशी सख्ख्या भावांना का संपवलं?; नाशिकमधील दुहेरी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले, कारण समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:27 IST

ज्या टोळक्याने दोघा भावांना संपवले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nashik Double Murder Case : रंगपंचमीच्या सणादिवशी नाशिक शहर दुहेरी हत्या प्रकरणाने हादरले होते. दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून पूर्ववैमनस्यातून वचपा काढायचा आणि वर्चस्ववाद टिकवून ठेवण्यासाठी जाधव बंधूंना टोळक्याने संपवले, असं पोलिस तपासात प्रथमदर्शनी समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अवघ्या सहा तासांत या दुहेरी खुनातील पाचही आरोपींना हेरून बेड्या ठोकल्या. 

नाशिक शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरुच आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी सिडकोमध्ये एकाचा खून झाला. त्या घटनेला पाच दिवस होत नाही तोच पुन्हा रंगपंचमीच्या उत्साहाचा शेवट थेट दुहेरी हत्याकांडाने झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडल्याची चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. संशयित आरोपी सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश ऊर्फ सोनू उशिरे या हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. मृत्युमुखी पडलेल्या जाधव बंधूंपैकी उमेश ऊर्फ मन्ना जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते, असेही बोलले जात आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. ज्या टोळक्याने दोघा भावांना संपविले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे उपनगर पोलिसांपुढे टाकळीरोड, बोधलेनगर, आंबेडकरवाडी, जय भवानी रोड, जेलरोड या भागातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

शेजारी बनले वैरीमुख्य संशयित आरोपी अनिल रेडेकर, सचिन रेडेकर हे मयत जाधव बंधूंच्या शेजारीच राहायला होते. दुहेरी खुनातील हल्लेखोरांमध्ये हे मुख्य संशयित हल्लेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यांच्यामध्ये जुने वाद होते. या वादातून व परिसरात कोणाचे वर्चस्व कायम ठेवायचे यावरून हा हल्ला झाला. रंगपंचमी खेळून संशयित रेडेकर हे घरी जात असताना रस्त्यात त्यांचा शाब्दिक वाद जाधव बंधूंसोबत झाला. या वादानंतर टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढविल्याचे समोर आले आहे.

खंडणी मागणीचीही घटनेला किनारदुहेरी खुनाच्या घटनेला वर्चस्ववादासह खंडणी मागणीचीही किनार असल्याचे दिसत आहे. दोघांकडून ५० हजारांचा हप्ता मागितला जात होता. यामुळे जाधव यांच्याविरोधात तक्रार दिल्याने त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच टोळक्यापैकी सागर गरड याच्यावर अमली पदार्थविक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस