शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:48 AM

‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.

नाशिक : ‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या विवाहाच्या निमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे शहरात येणार असल्याचे गृहीत धरून सुकाणू समितीचे सतरा कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर दानवे यांना ‘बुक्का’ लावून औंक्षण करत काळी शाल व पोशाख देऊन सत्कार करण्यासाठी जमले होते. या आंदोलनाची कुणकुण मुंबई नाका पोलिसांना लागताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्यासह मुंबई नाका पोलिसांचे पथक विश्रामगृहावर दानवे यांच्या आगमनाअगोदरच येऊन पोहचले. यावेळी आगळ्या अपारंपरिक सत्काराच्या हेतूने एकत्र आलेल्या सुकाणूच्या त्या १७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कार्यकर्त्यांना भुजबळ यांनी फौजदारी प्रक्रियेनुसार कलम ११ अन्वये नोटीस बजावली आहे. सदर नोटिसीद्वारे भविष्यात त्या १७ कार्यकर्त्यांच्या वर्तनावरून कुठल्याही प्रकारे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधितांकडून सहा महिन्यांच्या दीर्घ मुदतीचे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र का घेतले जाऊ नये? अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे सोमवारी (दि.२७) सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत संबंधितांनी त्यांचे म्हणणे सादर न केल्यास आपले कुठलेही म्हणणे नाही, असे समजून पोलीस अहवालानुसार कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. एकूणच सदर नोटीस बजावून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपर्यंत सार्वजनिक शांततेचा व कायदा सुव्यवस्थेचा कुठल्याही प्रकारे भंग करणाºया आंदोलनापासून लांब राहण्याचा इशाराच दिला आहे. सतरा कार्यकर्ते अपारंपरिक सत्कारासाठी जमले होते. त्यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून भविष्यात शहरात कुठल्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र सहा महिन्यांच्या मुदतीचे भरून का घेतले जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.- डॉ. राजू भुजबळ, सहायक आयुक्त

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा