शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

नासाका कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:35 AM

नाशिक सहकारी  साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

नाशिकरोड : नाशिक सहकारी  साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.  नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासाका यंदाच्या हंगामात सुरू होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. नासाका कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने गावोगावी फिरून ऊसलागवडीसाठी केलेले आवाहन व देण्यात येणारा भाव यामुळे शाश्वत पीक म्हणून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. यंदा मुबलक पाऊस झाल्याने सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड दमदार झाली आहे. नासाका सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या घोषणांमुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. त्याप्रमाणे नासाकाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून, नोव्हेंबर व डिसेंबरदरम्यान बाहेरील कारखान्यांनी अवघी ८० हजार मेट्रिक टन ऊसतोड केली आहे. तसेच संगमनेर, प्रवरा आदी कारखान्यांचे ऊसतोड मजूर तोडणीसाठी शेतकºयांकडून जादा पैशांची आकारणी करीत आहे. चालू वर्षी जिल्हा बँकेने शेतकºयांना कुठलाही कर्जपुरवठा केला नाही.   इतर जिल्ह्यांतील ९ कारखान्यांनी उर्वरित उसासाठी जानेवारी महिन्यात आपापल्या कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे नासाका कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊसतोडीसाठी आखडता हात घेतल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक