शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्रांच्या संहारकतेने शास्त्रज्ञ बनले तत्त्वज्ञ

By admin | Updated: October 26, 2016 00:22 IST

शंकरराव गोवारीकर : जागतिक शांतता परिषदेत प्रतिपादन

नाशिक : अणुशक्ती देशाच्या संरक्षणाचे आणि विकासाचे साधन बनली असतानाच याच अणुशक्तीच्या माध्यमातून संशोधन करणारे शास्त्रज्ञ अण्वस्त्रांच्या संहारक स्वरूपाच्या दर्शनाने तत्त्वज्ञ बनले असून, ते शांततेचा उद्घोष करू लागले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले.इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी व एसएमआरके महिला महाविद्यालयात दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या शांतता परिषदेच्या चौथ्या सत्रात गोवारीकर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत होते. ते म्हणाले, अण्वस्त्रांच्या संहारक प्रयोगानंतर शास्त्रज्ञांनी त्याची जगावर होणारी संहारक परिस्थिती समोर आणत तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविले. या काळात शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अण्वस्त्रांचा जगाचा विध्वंस करण्याचा रोष पाहता अण्वस्त्र प्रयोगाची चूक लक्षात घेत करारात अडकवणे फायदेशीर ठरविले असून, यानंतरच जागतिक सत्तांचा शांततेचा विचार करण्याची आणि त्यादृष्टीने पावले उचलण्याची वाटचाल सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी म्हणाले, विहित गुणवत्ताधारकांबरोबरच २५ टक्के शिक्षक समाजातील अनुभवाच्या शाळेत शिक्षण घेतले पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तथा प्रशिक्षणार्थींचा पूर्ण विकास होऊ शकेल. ते परिषदेतील ‘शांतता शिक्षणासाठी युवकांचा संपूर्ण विकास’ या विषयावर बोलत होते. याच विषयावर मंगळवारी एकूण चार सत्रांमध्ये विविध तज्ज्ञांनी भारतीय शिक्षण पद्धतीचा लेखाजोखाच मांडला. डॉ. विनायक गोविलकर यांनी शिक्षण केवळ अर्थार्जनाचे साधन व्हायला नको, तर शिक्षण हे ज्ञानार्जनाची साधना होण्याची गरज व्यक्त केली. अशा ज्ञानार्जनाच्या साधनेतून क्षमतांचे संक्र मण, समर्पण म्हणजे शिक्षण होय, असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. शरद खंडेलवाल, प्रा. सपना माथुरे, प्रा. वीणा कुलकर्णी, डॉ. राजश्री कापुरे, डॉ. प्रकाश नेहे यांनी आपले निबंध यावेळी सादर केले. यावेळी डॉ. रूपल सिंग, सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, उपप्राचार्य साधना देशमुख, प्रा. डॉ. मोहिनी पेटकर, डॉ. कविता पाटील, परिषदेचे संयोजक डॉ. विवेक बोबडे, प्रा. सीमा भादुरी, डॉ. एस. आर. खंडेलवाल आदि होते. (प्रतिनिधी)