शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य ...

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य इतरांपासून मागे तर पडणार नाही ना? या भीतीपोटी पालक मुलांवर पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने लक्ष ठेवत असून, प्रत्यक्ष शालेय शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना सातत्याने सतावत आहे. याच तणावातून पालकांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये भर पडत असल्याचे समोर आहे, तर पालकांकडून मुलांवर पूर्वीपेक्षा अधिक लक्ष केंद्रित केल्याने मुलांना त्यांच्यावरील बंधनांमध्ये अनावश्यक वाढ झाल्याची भावना निर्माण होऊन मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांसोबतचा संवाद वाढवून त्यांना सुरक्षित वातावरणात खेळण्यासाठी तसेच घरातील छोटया मोठ्या गोष्टींमध्ये सक्रीय सहभाही होण्याची संधी देण्याची गरज असल्याचा सल्ला मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - ११७०४५

दुसरी -१२१३४२

तिसरी -१२०६१८

चौथी- १२३९३९

पाचवी- १२२७४३

सहावी - १२०६४५

सातवी- ११८३३२

आठवी- ११५९१०

नववी- १११४२१

दहावी- ९८९४९

मुलांच्या समस्या...

- ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांमध्ये स्क्रीन एक्स्पोजर वाढले आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टी मुलांसमोर येऊ लागल्याने त्यांचे लक्ष विचलित होत आहे.

- पालकांकडून अभ्यासासाठी सातत्याने पाठपुरावा होत असल्याने मुलांवर केवळ अभ्यासाचा ताण निर्माण होऊन त्यांच्यात चिडचिड वाढत आहे

- शाळा बंद असल्याने मुलं घरामध्ये कोंडली गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढीला लागला असून, ती नैराश्याकडे जाण्याची भीती निर्माण होत आहे.

---

पालकांच्या समस्या...

- ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे आपला पाल्य दुर्लक्षित होऊन तो इतरांच्या तुलनेत मागे तर पडणार नाही ना? अशी भीती पालकांमध्ये वाढीस लागली आहे.

- गेल्या दीड वर्षात घरातच अडकून पडलेल्या मुलांमध्ये लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा वाढीस लागल्याने त्यांच्या आरोग्याची चिंताही पालकांना सतावत आहे.

- शासनाने ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ अशी मोहीम राबवली असली तरी आता प्रत्यक्षात घरोघरी ‘शाळा बंद, समस्या सुरू’ अशी परिस्थिती असून, मुलांना मिळणारे उपक्रम, शिक्षण, शिबिरे यांचे ऑनलाइन पर्याय अपुरे तर ठरत नाही ना, याची चिंता पालकांमध्ये वाढीस लागली आहे. ---

मुलाकडून ऑनलाईन पर्यायाचा शिक्षणासाठी वापर वाढला असून, गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने त्यांचा शिक्षक, शालेय मित्र व सभोवतालच्या वातावरणाशी संपर्क तुटला आहे. त्याचा परिमाण त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊन त्यांच्यात चिडचिड, एकलकोंडेपणा, लठ्ठपणा व नैराश्य वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे त्यांची मानसिक, भावनिक व सामाजिक विचारांची क्षमताही आवश्यकतेनुसार विकसित होत नाही. तुलनेत पालकांवर एवढा परिमाण होत नसला तरी मुलांचे बदलणारे वर्तन पालकांवर मानसिकदृष्ट्या परिणाम करणारे ठरते. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत संवाद वाढविणे आवश्यक आहे. तसेच घरातील छोट्या मोठ्या कामात मुलांना सहभागी करून घेणे, सुरक्षित वातावरणात खेळण्याची परवानगी देण्याची गरज आहे.

डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक.