शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सोशल मिडियावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 19:00 IST

सध्या दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असून, ते परीक्षेच्या तणावाचा सामना करीत असताना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या विशेष योजनांद्वारे 50 ते 60 टक्के गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीवर परिणाम होऊन त्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावर शिष्यवृत्तीसंदर्भात अफवा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम शिष्यवृत्ती योजनेलेला जोडले कलाम, वाजपेयी यांचे नाव

नाशिक : सध्या दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असून, ते परीक्षेच्या तणावाचा सामना करीत असताना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या विशेष योजनांद्वारे 50 ते 60 टक्के गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीवर परिणाम होऊन त्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला असताना शिक्षण विभागाने मात्र याकडे आत्तार्पयत काणाडोळा केला आहे. दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा अंतिम टप्प्यात आलेली असताना सोशल मीडियावर शिष्यवृत्तीसंदर्भात भुवया उंचावण्यास भाग पाडणारा एकच मॅसेज फिरू लागला आहे. शासनाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत 50 टक्के अथवा त्याहून अधिक गुण मिळविले आहे त्यांना 11 हजार रुपये व ज्यांनी बारावीच्या परीक्षेत 60 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवले आहे, अशा विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची अफवा पसरवली जात असून, यासाठी संबंधित महापालिका अथवा नगरपालिका कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन या मेसेजद्वारे करण्यात आले आहे. मात्र अशी कोणतीही शिष्यवृत्ती सरकारकडून जाहीर झाली नसल्याची माहिती वजा स्पष्टीकरण खुद्द शिक्षण खात्याकडून देण्यात आले आहे. बारावी व दहावीची परीक्षा सुरू असताना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये तथ्य नसल्याचे नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांनी स्पष्ट केले असून यासंबंधीचे अधिकृत पत्र काढून विद्यार्थ्यांमधील गैरसमज दूर कऱणार अशल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अफवांची शहनिशा गरणे गरजेचेदहावी व बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी आहे. त्यामुळे या परीक्षेचा विद्याथ्र्यावर मोठय़ा प्रमाणात तणाव असताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या अशा व्हायरल पोस्ट समाजहितासाठी धोकादायक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी कोणत्याही मेसेजवर सहज विश्वास न ठेवता त्यांची शहानिशा करणे आवश्यक झाले आहे.  

पोस्टमध्ये तथ्य नाहीसोशल मीडियावर माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने शिष्यवृत्तीविषयी फिरणाऱ्या पोस्ट चुकीच्या असून, अशाप्रकारची कोणतीही योजना सध्या सुरू नाही. त्यामुळे विद्याथ्र्यानी व त्यांच्या पालकांनी अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये.- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, नाशिक महानगरपालिका नाशिक

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षा