दसऱ्यानिमित्त फुलबाजारात दरवळला सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:29 IST2018-10-17T00:28:43+5:302018-10-17T00:29:47+5:30
गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून, दसºयाच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ झाल्याने झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १५० ते १६० रुपये जाळीने विकला जात आहे.

दसऱ्यानिमित्त फुलबाजारात दरवळला सुगंध
नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून, दसºयाच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ झाल्याने झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १५० ते १६० रुपये जाळीने विकला जात आहे. नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फुलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. दसºयाच्या दिवशी तर घरातील देवदेवतांसह शस्त्रपूजन व वाहने आणि गृहसजावटीसाठीही फुलांचा वापर होत असल्याने फुलांना मागणी वाढली आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारात कापडाची कृत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सवांमध्ये खºया फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी रंग भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फुलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात फुलांच्या खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.
नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून, दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी दुष्काळाच्या झळा बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.