शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भावी पिढीला सावरकर समजावून देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:12 IST

मी विनायक दामोदर सावरकरांची कथा इथेच थांबवतो आहे. काळाच्या ओघात अनेकदा इतिहास बदलतात, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कसे होते ते तुम्हीच ठरवा अन् तुमच्या भावी पिढीला सावरकर सांगा’ असे आवाहन व्यासपीठावरून करताच सभागृहात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयजयकार करत सभागृह दणाणून सोडले.

ठळक मुद्देयोगेश सोमण । सखी मंडळाचा उपक्रम

नाशिक : ‘मी विनायक दामोदर सावरकरांची कथा इथेच थांबवतो आहे. काळाच्या ओघात अनेकदा इतिहास बदलतात, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कसे होते ते तुम्हीच ठरवा अन् तुमच्या भावी पिढीला सावरकर सांगा’ असे आवाहन व्यासपीठावरून करताच सभागृहात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयजयकार करत सभागृह दणाणून सोडले.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सखी मंडळाच्या वतीने कुर्तकोटी सभागृहात योगेश सोमण यांच्या ‘मी विनायक दामोदर सावरकर’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या दीड तासांच्या कार्यक्रमास सोमन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उभा केला. सावरकर यांचे बालपण, त्यांचे शिक्षण, शिक्षण सुरू असतानाच स्वातंत्र लढ्यात त्यांनी घेतलेली उडी, विवाह, लंडन येथे स्थापन केलेली अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना, पॅरीसमधील भेटी, तेथे केलेली शस्त्र खरेदी, पुढे त्यांच्यावर चाललेला खटला आणि झालेली काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमानच्या जेलमध्ये करावी लागेली जीवघेणी कामं तेथील शिक्षा, जेलर डेव्हीड बॅरीशी वेळोवेळी झालेला संवाद आणि दहा वर्षांनंतर तेथून झालेली सुटका असे प्रसंग त्यांनी आपल्या खास शैलीत मांडले.म्हणजे माफी मागणे नाही..सावरकर यांचा माफीनामा हा वादाचा विषय आहे. त्यावर याच प्रयोगातून भाष्य करताना सोमण यांनी जेलमधून आपली सुटका करून घेणे हा प्रत्येक कैद्याचा हक्क आहे. त्यासाठी पिटीशन दाखल करणे म्हणजे माफी मागणे होत नाही. त्याचदृष्टीने १९२० साली जेल कमिशनसमोर साक्ष दिली. त्याचे पडसाद आजपर्यंत उमटत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. सावरकर यांची कोठडी ज्या ठिकाणी होती, त्याठिकाणावरून कैद्यांना फाशी कशी दिली जाते, हे स्पष्टपणे दिसत होते. त्याकाळी जेलमध्ये पंधरा दिवसातून दोन ते तीन जणांना फाशी दिली जात असे, यादृष्यांमुळेही सावरकर आपल्या ध्येयापासून विचलित झाले नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक