शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

नरहरी झिरवाळ यांच्या घरासमोर सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:16 AM

शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालुक्यांतील शेतकºयांनी शुक्रवारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला.

दिंडोरी : शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालुक्यांतील शेतकºयांनी शुक्रवारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला.  हा देश कृषिप्रधान असून, या देशात रोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत ही दुर्दैवी बाब असून, हे थांबविण्यासाठी शेतकºयांना कायद्याने हमीभावाचा व कर्जमुक्तीचा अधिकार मिळायला हवा. या संदर्भातले खासदार राजू शेट्टी यांनी तयार केलेलं हमीभाव व कर्जमुक्तीचं विधेयक संसदेत मंजूर व्हावे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे व तसा आग्रह लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींकडे धरावा, असे मत यावेळी संदीप जगताप यांनी व्यक्त केलं.  नरहरी झिरवळ यांनी निवेदन स्वीकारल्यावर मी तुमच्या भावना निश्चितपणे राष्ट्रपतींना कळवीन. मी व माझा पक्ष तुमच्या सोबत आहे. खासदारसाहेबांच्या घरासमोरील आंदोलनात मीही सहभागी होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या सत्याग्रहात संदीप जगताप, गंगाधर निखाडे, सचिन कड, संपत जाधव, नितीन देशमुख, अजित कड, राकेश शिंदे, संजय निरगुडे, विलास सरोदे, अभय सूर्यवंशी, मुकुंद अहेर, जनार्दन चौधरी, भाऊसाहेब पाटील, सुधीर पाटील, संजय निरगुडे, राजेंद्र मोकाट, अशोक पताडे, जीवन मोरे, अजय मेधने, कचरू मोरे, गंगाधर गाढवे, जनार्धन चौधरी, नितीन भालेराव, कृष्णा मातेरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.  आम्ही रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमच्या लोकप्रतिनिधींनीच आमच्या साठी कायदे मंडळात भांडावे. शेतकºयांचे शोषण होईल असे कायदे मोडीत काढून नव शेतकरी हिताचे कायदे करावे. तसेच पाकिस्तनातून आलेली साखर , तूर ही शेतकºयांचा जीव घेणारी आहे. असे मत गंगाधार निखाडे यांनी मांडले. यावेळी डॉ योगेश गोसावी, भास्कर भगरे, अभय सूर्यवंशी, जीवन मोरे आदींनी आपले विचार मांडले.

टॅग्स :MLAआमदारFarmerशेतकरी