शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सह्याद्री नवल : पर्यटक अनुभवत आहेत ‘सांदण’ सर करण्याचा थरार...

By अझहर शेख | Published: January 05, 2019 1:58 PM

सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ठळक मुद्देसांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अर्थात जमीनीला पडलेली मोठी भेग पर्यटकांनी कुठल्याही पध्दतीने निसर्गाला हानी पोहचवू नये

नाशिक : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ‘सांदण’ सर करण्याचा थरार अनुभवण्यासाठी गिरीभ्रमंती करणाºया गिर्यारोहकांसह पर्यटकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. ‘सांदण’ दरी ही अकोले तालुक्यातील साम्रद गावात आहेत. हिवाळा असल्यामुळे सांदण सर करण्यास फारसा अडथळा येत नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक या दरीला भेट देत दरीमधून चालण्याचा थरार अनुभवत आहेत. भंडारद-यापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर सांदण दरी आहे. भंडारदरा धरणाच्या स्पीलवेलवरुन पुढे आल्यानंतर रतनवाडी फाट्यावरून कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटेवरुन रतनवाडीमार्गे साम्रद गावाच्या शिवारात सांदण दरी गाठता येते.

सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अर्थात जमीनीला पडलेली मोठी भेग यामुळे ही दरी किंवा घळ निर्माण झाल्याचे बोलले जाते. सांदणचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून वृक्षराजीने नटलेला आहे. यामुळे सांदण दरी नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. सांदण दरी पावसाळ्यात बघणे अशक्य होते. प्रचंड धुके व दरीकडे जाणाºया वाटेत चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तवर सांदणचा मार्ग बंद केला जातो. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सांदण दरीचा थरार अनुभवणे शक्य होते. यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सांदणदरीमध्ये उतरू लागले आहेत. या दरीला भेट देताना निसर्गामध्ये कुठल्याहीप्रकारचा हस्तक्षेप पर्यटकांनी टाळावा तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, इतकीच माफक अपेक्षा गावकºयांकडून व्यक्त केली जात आहे. संपूर्ण दरी पार केल्यानंतर समोर विराट कोकणकडा जणू सांदणप्रेमींचे स्वागतच करतो. त्याचे विराट सौंदर्यशाली रूपडे बघून मनाला मोहिनी न पडल्यास नवलचं. भंडारदरा टुरिझम संस्थेच्या वतीने पर्यटकांना भंडारदरा परिसरातील निसर्गसौंदर्य तसेच विविध पर्यटनकेंद्रांची माहिती तसेच मार्गदर्शन केले जात आहे. पर्यटकांनी भंडारदरा परिसरात निसर्गाच्या सानिध्यात फिरताना कुठल्याहीप्रकारे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी जाण्याचा किंवा सेल्फी टिपण्याचा मोह करु नये, तसेच जंगलाच्या परिसरात विनाकारण पाऊलवाटा सोडून भटकंती करु नये, स्थानिक वाटाड्या तसेच संस्थेच्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन रवी ठोंबाडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत हा सगळा परिसर येत असल्यामुळे वन-वन्यजीव विभागाच्या सर्व नियम या परिसराला लागू आहे. या भागात जाळपोळ करणे, मद्यप्राशन करुन धिंगाणा घालणे, जैवविविधतेला त्रास होईल, असे कृत्य करणे भारतीय वन संवर्धन व वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत अपराध ठरतो. त्यामुळे पर्यटकांनी कुठल्याही पध्दतीने निसर्गाला हानी पोहचवू नये, असे आवाहन नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी केले आहे. निसर्गाला हानी पोहचवताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर वनविभागाच्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचा-यांचे पथक नियमीत स्वरुपात गस्तीवर असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकAhmednagarअहमदनगरtourismपर्यटन