शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

बेस्ट सेवेतील एस. टी. बसेस माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात येणाऱ्या बसेस आता शनिवार (दि. १५)पासून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या मुंबईत असलेल्या बसेस माघारी येणार आहेत.

कोरोनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने बेस्ट उपक्रमाला वाहतूक करण्यासाठी राज्यभरातील आगारांमधून सुमारे एक हजार बसेस पुरविण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील १३ आगारांमधूनदेखील बसेस, चालक-वाहक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवा बजवावी लागली. कोरोनाच्या काळातील ड्युटी तसेच राहण्याची आणि अन्नपाण्याची होणारी गैरसोय यामुळे कर्मचाऱ्यांची ड्युटी करण्याबाबत नाराजीदेखील होती. मात्र, मुंबईत ड्युटी करणे बंधनकारक करण्यात आल्याने एस. टी. प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवले.

नाशिक विभागातून पंधरा दिवसातून चालक-वाहकांना मुंबईला जावे लागत होते. जिल्ह्यातील १३ आगारांमधून मुंबईला बसेस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार मागील वर्षी सुरू झालेली ही सेवा मे २०२१पर्यंतही सुरू आहे. सद्यस्थितीत ५० बसेस आणि २०० कर्मचारी मुंबईला सेवा बजावत आहेत. आता मात्र या कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने राज्यभरातील एस. टी. विभागातून आलेल्या बसेस आणि कर्मचाऱ्यांना परत पाठविण्याबाबतचे पत्र राज्य परिवहन महामंडळाला दिले आहे.

मुंबईत कोरोनाच्या काळात सेवा करण्याबरोबरच आपल्या जिल्ह्यातही लागलीच सेवा बजवावी लागत होती. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची चिंता होती. यातूनच मुंबईतील ड्युटीला विरोध केला जात होता. मात्र, अशा विरोध करणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आल्याने चालक-वाहकांना मुंबईत सेवा करावी लागत होती. आता ‘बेस्ट’नेच एस. टी.ची सेवा कमी केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

---इन्फो--

राज्यभरातील नऊ आगारांच्या २५५ बसेस रिटर्न

‘बेस्ट’ने रायगड, रत्नागिरी, धुळे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सांगली अशा नऊ आगारांतील सुमारे २५५ बसेस पुन्हा संबंधित विभागांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. काही विभागांच्या बसेस थोड्या प्रमाणात सुरू राहणार आहेत.