शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

आरटीईची सोमवारी चौथी सोडत ; नाशकात 1431 जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 19:28 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली असून आरटीईची रखडलेली चौथी सोडत सोमवारी (दि.९)जाहीर करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देआरीटीई प्रवेशासाठी सोमवारी जाहीर होणार लॉटरी प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा संधी मिळणाऱ्या विदयार्थ्यांचे 11 ते 21 सप्टेंबरदरम्यान प्रवेश

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली असून आरटीईची रखडलेली चौथी सोडत सोमवारी (दि.९)जाहीर करण्यात येणार आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिना  उलटूनही केवळ तीनच फेºया झाल्या असून उपलब्ध ५ हजार ७३५ जागांपैकी १ हजार ४३१ जागा रिक्त असताना चौथ्या फेरीसंदर्भात कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही याविषयी पालकांमध्ये संभ्रम निर्माण  झाला होता. तब्बल तीन महिने प्रक्रिया चालल्यानंतरही १४३१ जागा रिक्त राहून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसतील तर वंचित घटकांना शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा सवाल ‘लोकमत’ उपस्थित केल्यानंतर सुस्थावलेल्या शिक्षण विभागाने चौथी फेरी घेण्याची घोषणा शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारी चौथी सोडत काढली जाणार असून त्यानंतर प्रवेशाची संधी मिळणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांना ११ ते ३१ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

इन्फो-आत्तापर्यंत ४ हजार ३०४  प्रवेश जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७३५ जागांसाठी १४ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ ४ हजार ३०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले असून उर्वरित अजूनही १० हजार २५६ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत, तर तब्बल १ हजार ४३१ जागा रिक्त आहेत. अनेक पालक या प्रक्रियेवरच अवलंबून आहेत. अशा पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने चौथ्या फेरीची घोषणा केल्याने प्रतीक्षेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा