शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

आरटीईची सोमवारी चौथी सोडत ; नाशकात 1431 जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 19:28 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली असून आरटीईची रखडलेली चौथी सोडत सोमवारी (दि.९)जाहीर करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देआरीटीई प्रवेशासाठी सोमवारी जाहीर होणार लॉटरी प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा संधी मिळणाऱ्या विदयार्थ्यांचे 11 ते 21 सप्टेंबरदरम्यान प्रवेश

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली असून आरटीईची रखडलेली चौथी सोडत सोमवारी (दि.९)जाहीर करण्यात येणार आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिना  उलटूनही केवळ तीनच फेºया झाल्या असून उपलब्ध ५ हजार ७३५ जागांपैकी १ हजार ४३१ जागा रिक्त असताना चौथ्या फेरीसंदर्भात कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही याविषयी पालकांमध्ये संभ्रम निर्माण  झाला होता. तब्बल तीन महिने प्रक्रिया चालल्यानंतरही १४३१ जागा रिक्त राहून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसतील तर वंचित घटकांना शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा सवाल ‘लोकमत’ उपस्थित केल्यानंतर सुस्थावलेल्या शिक्षण विभागाने चौथी फेरी घेण्याची घोषणा शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारी चौथी सोडत काढली जाणार असून त्यानंतर प्रवेशाची संधी मिळणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांना ११ ते ३१ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

इन्फो-आत्तापर्यंत ४ हजार ३०४  प्रवेश जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७३५ जागांसाठी १४ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ ४ हजार ३०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले असून उर्वरित अजूनही १० हजार २५६ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत, तर तब्बल १ हजार ४३१ जागा रिक्त आहेत. अनेक पालक या प्रक्रियेवरच अवलंबून आहेत. अशा पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने चौथ्या फेरीची घोषणा केल्याने प्रतीक्षेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा