शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:58 AM

वागदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत धरणात पोहोचणार असल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक : वागदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत धरणात पोहोचणार असल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरठेठाक पडल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मनमाड मुख्याधिकाऱ्यांनी पाणी नियोजन वेळेत न केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे नियोजन करून पालखेड डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्यानंतर आता पालखेडमधून पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरणातून लाभक्षेत्रातील बिगर सिंचनासाठी मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, येवला नगरपरिषद, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना विंचूर, लासलगाव, आंगेगाव या संस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून ४८० दलघफू पाणी दि. २ ते १० जून या कालावधीत आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन कालावधीत पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष दक्षतादेखील घेण्यात आली आह े.आवर्तन सोडण्याच्या कालावधीत २२ तास वीजबंदी करण्यात आली असून, फक्त सकाळी २ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. दरम्यान, सर्व पाणीवापर संस्थांना पाणी पोहोच करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असल्यामुळे तशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या असून, पाटबंधारे विभागानेदेखील अनधिकृत पाणी ओढणाºयांवर कारवाई केलेली आहे.दोन हजार डोंगळे उद्ध्वस्तपालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पालखेडमधून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी कालव्यातील सुमारे दोन हजार डोंगळे उद्ध्वस्त करण्यात आले. कालव्यातील जमिनीखालून पाईप टाकून पाण्याची चोरी केली जाते. सदर पाईप काढून ते जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी