शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सिन्नरमध्ये पशुधनाला बाजाराचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:57 PM

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चारा-पाणीटंचाई जाणवू लागल्याने जिवापाड जपवणूक केलेल्या लाखमोलाच्या पशुधनाला नाइलाजास्तव बाजाराचा रस्ता दाखविण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात चारा-पाणीटंचाई जाणवू लागल्याने जिवापाड जपवणूक केलेल्या लाखमोलाच्या पशुधनाला नाइलाजास्तव बाजाराचा रस्ता दाखविण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.पाण्याची कुठलीही शास्वत सुविधा या भागात नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायने मागील पाच-सहा वर्षांत चांगलेच बाळसे धरले आहे. उत्पादनाचे साधन म्हणून प्रत्येक घरासमोर दोन ते तीन दुभती जनावरे पहावयास मिळाल्यास नवल नाही. शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, तचेस मजुरीवर होणारा खर्च याचा सारासार विचार केल्यास शेतकरी वर्गाला हातात किती पैसे मिळणार याचा विचार न केलेलाच बरा. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय या भागात फोफावला असला तरी, पाणी तसेच चाराटंचाईने या व्यवसायालाही उतरती कळा लागली आहे. दुधाचे बाजूलाच मात्र पशुधन वाचवण्यासाठी मोठी धडपड करणे भाग पडत आहे. चाराच संपुष्टात आल्याने ओला तसेच सुका चाऱ्याच्या किमतीत चारपट वाढ झाली आहे. ज्वारीच्या कडब्याच्या शंभर पेंढ्यांना चार हजार रुपये तसेच उसाच्या एक ा मोळीला पन्नास रुपये द्यावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे खासगी टॅँकरचालकांची चलती असल्याने दोनशे लिटर पिंपाला दीडशे रुपये मोजावे लागतात.पूर्व भागातील मलढोण, पिंपरवाडी, कहांडळवाडी, भोकणी, खंबाळे, वावी, मिठसागरे, सायाळे, मीरगाव फत्तेपूर, सुरेगाव या ठिकाणी सिंचन सुविधा नसल्याने भीषण दुष्काळ आहे. रस्त्याच्या कडेला टॅँकरच्या प्रतीक्षेत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिंपावरून गावात दुष्काळी स्थितीचा अंदाज येतो. पिण्यास मुबलक पाणी नाही तर जनावरांना चारा कोठून आणायचा, अशी स्थिती या भागात असल्याने पशुधन विक्रीचे प्रमाण वाढले आहे. लाखमोलाच्या पशुधनाला ग्राहकच नसल्याने दलाल याचा फायदा उठवत कवडीमोल खरेदी केलेली जनावरे कसायाच्या दावणीला जात असल्याचे चित्र तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडे बाजारात पहावयास मिळत आहे. शासनाने सिन्नरच्या पूर्व भागात निदान पाऊस पडेपर्यंत चारा छावणी सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी