शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

कळवण तालुक्यात रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:19 IST

कळवण तालुक्यात प्रवास करताय ! जरा जपून !! तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गावरून वाहन चालवणे कठीण झालंय. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकअ‍ॅपसर, टायर फुटू लागले आहेत. वाहनांचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील जनता त्रस्त झाली असून, रस्त्यांना वैतागली आहे.

ठळक मुद्देप्रवासी त्रस्त : शिरसमणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

कळवण : तालुक्यात प्रवास करताय ! जरा जपून !! तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गावरून वाहन चालवणे कठीण झालंय. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकअ‍ॅपसर, टायर फुटू लागले आहेत. वाहनांचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील जनता त्रस्त झाली असून, रस्त्यांना वैतागली आहे.कळवण तालुक्यात ग्रामीण व आदिवासी भागातून तालुक्याला जोडणारे तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक रस्त्यांवरील डांबर उखडून गेल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अशा रस्त्यांवरून प्रवास करताना सर्वसामान्य जनता वैतागली आहे. रस्त्यांची डागडुजी करूनही पुन्हा रस्ते ‘जैसे थे’ झाले आहेत. पुन्हा त्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. मात्र यंत्रणेच्या गैरहजेरीत ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे अन् मजुरांच्या भरवशावर दुरुस्तीची कामे कितपत दर्जेदार होणार यात शंका आहे. मागील वर्षी ज्या रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे यंदा पुन्हा त्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तालुक्यातील अनेक रस्त्यांची गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुरु स्ती न केल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेच्या समस्यांची सोडवणूक करत नाहीत, असा आरोप वाहनचालक व नागरिकांनी केला आहे.कनाशी ते शृंगारवाडी रस्ता तर मृत्यूला आमंत्रण देणारा ठरू पाहत आहे. दळवट, जिरवाडा, शेपूपाडा, तताणी फाटा ते हतगड घाटापर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिरसमणी-साकोरे रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गाने होणारी शेतमाल वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता सुधारण्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. शिरसमणी ते साकोरे हा तीन किलोमीटरचा रस्ता असून, शिरसमणी, दह्याणे, कुंडाणे, भुसणी, ओतूर, जिरवाडे या गावातील शेतकरी आपला भाजीपाला व कांदा विक्रीसाठी वणी व नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जाण्यासाठी मुख्यत: याच रस्त्याचा वापर करतात. भेंडी फाटा ते भेंडी या रस्त्याची अवस्था अशीच आहे. खडीकरण झाले; परंतु रस्त्यांच्या नशिबात डांबरीकरण नसल्याने रस्ता डांबरीकरण झालेला नाही म्हणून खडी डोके वर काढू लागली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनचालक व प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. परंतु या खराब रस्त्यांकडे लक्ष देण्यास संबंधित विभागाला वेळ मिळत नाही. आजच्या स्थितीत तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNashikनाशिक