शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

श्रीश्री रविशंकर मार्गावरील  झाडांना संरक्षणाअभावी वाढलेल्या धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:23 PM

महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार्गाच्या दुतर्फा कदंब, टॅबोबिया या प्रजातीच्या रोपट्यांची लागवड केली गेली. या मार्गावरील बहुसंख्य झाडांची चांगली दमदार वाढ झाली आहे; मात्र संरक्षणाअभावी वाढलेल्या झाडांना धोका उद्भवला असून, काही झाडांची हानी होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.

नाशिक : महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार्गाच्या दुतर्फा कदंब, टॅबोबिया या प्रजातीच्या रोपट्यांची लागवड केली गेली. या मार्गावरील बहुसंख्य झाडांची चांगली दमदार वाढ झाली आहे; मात्र संरक्षणाअभावी वाढलेल्या झाडांना धोका उद्भवला असून, काही झाडांची हानी होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.सुमारे २१ हजार रोपांच्या लागवडीचे जणू अभियान मनपाकडून वर्षभरापूर्वी राबविले गेले. मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी जेसीबीद्वारे खड्डे घेऊन दहा फुटांची रोपे लावली. रविशंकर दिव्य मार्गालगतही अशाप्रकारे रोपे लावली गेली. पावसाळ्यामुळे येथील काही रोपांनी तगही धरल्याने रोपे सध्या हिरवीगार दिसत आहे; मात्र काही रोपांनी मान टाकली आहे, तर काही रोपे जनावरांनी कुरतडल्याने नाहीशी झाली आहे. पाच वर्षे लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही पालिक ा प्रशासनाने त्यावेळी संबंधितांवर निश्चित केली होती; मात्र याचा विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे. लावलेल्या रोपांची सुरक्षितता वाºयावर सोडल्यामुळे रोपे लावून केवळ उद्दिष्टपूर्ती केली गेली; मात्र हेतूला हरताळ फासल्याचे बोलले जात आहे. केवळ दहा फूुटाच्या रोपांचे दिलेले ‘टार्गेट’ पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी हात वर केल्यामुळे रोपांचे वृक्ष होणार का? असा प्रश्न सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावरून फेरफटका मारणाºया नागरिकांनी उपस्थित केला आहे. ज्या रोपट्यांची हानी झाली त्याऐवजी पुन्हा नवीन रोपे अद्याप लावली गेली नाही. अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.वर्षभरापूर्वी लागवड; सुरुवातीपासूनच निष्काळजी गेल्या वर्षी वृक्षारोपणासाठी १५ जानेवारी ही डेडलाइन दिली होती. पाच ते सहा खासगी एजन्सींद्वारे यावेळी ‘खड्डे खोदा, रोपे लावा’ अशी मोहीम जिथे जागा मिळेल तिथे राबविण्यात आली. त्यावेळी दोन ते तीन दिवसांमध्येच काही ठिकाणी लावलेल्या रोपांच्या काड्या झाल्या, तर काही ठिकाणी नर्सरीमधील प्लॅस्टिक पिशव्यांसह रोपे खड्ड्यात उभी केल्याचेही वास्तव पुढे आले होते. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्चाचे ‘फळ’ नाशिककरांना पहावयास मिळेल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सर्वच रिंगरोडलगत लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे अखेरच्या घटका मोजत आहे. उन्हाळ्यात खºया अर्थाने ही झाडे जगविण्याचे आव्हान राहणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक