शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

निर्बंधांचा शेतीमालाला फटका; द्राक्षांची कवडीमोल दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 05:35 IST

 नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो.

संजय दुबबळेनाशिक : कोरोनाच्या संकटामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, तर राज्यातील निर्बंधांमुळे भाजीपाल्याचे दरही घसरले आहेत.  यावर्षी जिल्ह्यातून केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. कांद्यालाही कोरोनाचा फटका बसला.

आठ दिवसांनंतर सुरू झालेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा दरात काहीशी सुधारणा होऊन उन्हाळ कांदा सरासरी १,३२० रुपये तर लाल कांद्याला सरासरी १,१८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फळभाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो. मुंबईत काही भागात रस्त्यावर बसून भाजी विक्री करू दिली जात नसल्याने व्यापारी मालाची खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. 

टेबल आणि वाईन दोन्हीही द्राक्षांना फटका

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी विदेशातून होणारी द्राक्षांची मागणी घटली. त्यातच केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीला देण्यात येणारे अनुदान बंद केल्याने द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला. त्यातही द्राक्षाला खूप चांगला दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात आले; पण तेथेही दर कोसळल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल झाला नाही. याउलट वाईन द्राक्षांना भाव मिळाला; पण वायनरी चालकांकडून अपेक्षित खरेदी झाली नाही.

केळीच्या व्यापारात घट

-अजय पाटीलजळगाव :  जिल्ह्यातील केळीच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. रावेर व जळगाव बोर्ड भावाप्रमाणे केळीचे दर १,४०० रुपयांपर्यंत असले तरी व्यापारी केवळ ८०० रुपये प्रतिक्विंटल या दराने मालाची उचल करत आहेत.जळगाव जिल्ह्यातून जम्मू काश्मीर, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केळी पाठविली जाते. सद्य:स्थितीत नवती मृग बागाची काढणी सुरू आहे. या हंगामात दररोज जिल्ह्यातून सुमारे २ हजार टन माल बाहेर पाठविला जातो. मात्र, यंदा त्यात काही प्रमाणात घट झालेली पाहावयास मिळत आहे. व्यापारी माल काढण्यासाठी वेळेवर येत नाहीत. 

टरबूज शेतातच- गणेश आहेरअहमदनगर : कोरोनाच्या सावटाने बाजारपेठा बंद असल्याने सध्या टरबूज शेतातच पडून आहे. थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते; परंतु मागील वर्षापासून कोरोना संक्रमण काळात टरबूज उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. टरबूज पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात दोन हजार एकर शेतजमिनीवर टरबुजाची लागवड करण्यात आलेली आहे. बी-बियाण्यापासून कीड लागू नये म्हणून अनेक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची शेतकऱ्यांची स्थिती आहे. महिन्यापूर्वी टरबुजांच्या वेली कळी अवस्थेत असताना अचानक तापमान वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या टरबूज वेली करपून गेल्या तर काही ठिकाणी वेलीच्या कळ्यांची गळ झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या