शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

निर्बंधांचा शेतीमालाला फटका; द्राक्षांची कवडीमोल दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 05:35 IST

 नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो.

संजय दुबबळेनाशिक : कोरोनाच्या संकटामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, तर राज्यातील निर्बंधांमुळे भाजीपाल्याचे दरही घसरले आहेत.  यावर्षी जिल्ह्यातून केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. कांद्यालाही कोरोनाचा फटका बसला.

आठ दिवसांनंतर सुरू झालेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा दरात काहीशी सुधारणा होऊन उन्हाळ कांदा सरासरी १,३२० रुपये तर लाल कांद्याला सरासरी १,१८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फळभाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो. मुंबईत काही भागात रस्त्यावर बसून भाजी विक्री करू दिली जात नसल्याने व्यापारी मालाची खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. 

टेबल आणि वाईन दोन्हीही द्राक्षांना फटका

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी विदेशातून होणारी द्राक्षांची मागणी घटली. त्यातच केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीला देण्यात येणारे अनुदान बंद केल्याने द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला. त्यातही द्राक्षाला खूप चांगला दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात आले; पण तेथेही दर कोसळल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल झाला नाही. याउलट वाईन द्राक्षांना भाव मिळाला; पण वायनरी चालकांकडून अपेक्षित खरेदी झाली नाही.

केळीच्या व्यापारात घट

-अजय पाटीलजळगाव :  जिल्ह्यातील केळीच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. रावेर व जळगाव बोर्ड भावाप्रमाणे केळीचे दर १,४०० रुपयांपर्यंत असले तरी व्यापारी केवळ ८०० रुपये प्रतिक्विंटल या दराने मालाची उचल करत आहेत.जळगाव जिल्ह्यातून जम्मू काश्मीर, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केळी पाठविली जाते. सद्य:स्थितीत नवती मृग बागाची काढणी सुरू आहे. या हंगामात दररोज जिल्ह्यातून सुमारे २ हजार टन माल बाहेर पाठविला जातो. मात्र, यंदा त्यात काही प्रमाणात घट झालेली पाहावयास मिळत आहे. व्यापारी माल काढण्यासाठी वेळेवर येत नाहीत. 

टरबूज शेतातच- गणेश आहेरअहमदनगर : कोरोनाच्या सावटाने बाजारपेठा बंद असल्याने सध्या टरबूज शेतातच पडून आहे. थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते; परंतु मागील वर्षापासून कोरोना संक्रमण काळात टरबूज उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. टरबूज पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात दोन हजार एकर शेतजमिनीवर टरबुजाची लागवड करण्यात आलेली आहे. बी-बियाण्यापासून कीड लागू नये म्हणून अनेक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची शेतकऱ्यांची स्थिती आहे. महिन्यापूर्वी टरबुजांच्या वेली कळी अवस्थेत असताना अचानक तापमान वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या टरबूज वेली करपून गेल्या तर काही ठिकाणी वेलीच्या कळ्यांची गळ झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या