शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांचा शेतीमालाला फटका; द्राक्षांची कवडीमोल दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 05:35 IST

 नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो.

संजय दुबबळेनाशिक : कोरोनाच्या संकटामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, तर राज्यातील निर्बंधांमुळे भाजीपाल्याचे दरही घसरले आहेत.  यावर्षी जिल्ह्यातून केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. कांद्यालाही कोरोनाचा फटका बसला.

आठ दिवसांनंतर सुरू झालेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा दरात काहीशी सुधारणा होऊन उन्हाळ कांदा सरासरी १,३२० रुपये तर लाल कांद्याला सरासरी १,१८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फळभाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो. मुंबईत काही भागात रस्त्यावर बसून भाजी विक्री करू दिली जात नसल्याने व्यापारी मालाची खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. 

टेबल आणि वाईन दोन्हीही द्राक्षांना फटका

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी विदेशातून होणारी द्राक्षांची मागणी घटली. त्यातच केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीला देण्यात येणारे अनुदान बंद केल्याने द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला. त्यातही द्राक्षाला खूप चांगला दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात आले; पण तेथेही दर कोसळल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल झाला नाही. याउलट वाईन द्राक्षांना भाव मिळाला; पण वायनरी चालकांकडून अपेक्षित खरेदी झाली नाही.

केळीच्या व्यापारात घट

-अजय पाटीलजळगाव :  जिल्ह्यातील केळीच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. रावेर व जळगाव बोर्ड भावाप्रमाणे केळीचे दर १,४०० रुपयांपर्यंत असले तरी व्यापारी केवळ ८०० रुपये प्रतिक्विंटल या दराने मालाची उचल करत आहेत.जळगाव जिल्ह्यातून जम्मू काश्मीर, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केळी पाठविली जाते. सद्य:स्थितीत नवती मृग बागाची काढणी सुरू आहे. या हंगामात दररोज जिल्ह्यातून सुमारे २ हजार टन माल बाहेर पाठविला जातो. मात्र, यंदा त्यात काही प्रमाणात घट झालेली पाहावयास मिळत आहे. व्यापारी माल काढण्यासाठी वेळेवर येत नाहीत. 

टरबूज शेतातच- गणेश आहेरअहमदनगर : कोरोनाच्या सावटाने बाजारपेठा बंद असल्याने सध्या टरबूज शेतातच पडून आहे. थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते; परंतु मागील वर्षापासून कोरोना संक्रमण काळात टरबूज उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. टरबूज पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात दोन हजार एकर शेतजमिनीवर टरबुजाची लागवड करण्यात आलेली आहे. बी-बियाण्यापासून कीड लागू नये म्हणून अनेक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची शेतकऱ्यांची स्थिती आहे. महिन्यापूर्वी टरबुजांच्या वेली कळी अवस्थेत असताना अचानक तापमान वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या टरबूज वेली करपून गेल्या तर काही ठिकाणी वेलीच्या कळ्यांची गळ झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या