शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेंढे महाराजांचा शेतात तंबू ठोकत हरिनामाचा जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:57 PM

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे.

ठळक मुद्देवारी चुकल्याची खंत : दोन महिने एकाच जागी बसून पूर्ण करणार संकल्प

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे. सध्या ते येवला तालुक्यातील कानडी येथे नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून एक महिन्यापासून आपला संकल्प पूर्ण करत आहेत.दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठलराव शेलार, दिंडी मालक नारायण महाराज काळे, सुभाष महाराज बोराडे, वसंत महाराज शेळके, विष्णू महाराज लंके, अगस्ती महाराज, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष शंतनू महाराज पवार, जनार्दन महाराज शेळके यांच्याकडे रेंढे यांनी एकाच जागी बसून हरिनाम जप करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र वयाचा विचार करता असे न करण्याचा सल्ला सर्वांनी दिला, मात्र रेंढे त्यावर ठाम राहिल्याने त्यांना कानडी येथील नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून देण्यात आला.पिंपळगाव लेप पंचकमिटी भजनी मंडळ पिंपळगाव लेप व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात विणापूजन संतपूजन करून पिंपळगाव लेप ते कानडीपर्यंत कोरोनाच्या नियमांचे पालन करत दिंडी काढली. तंबूला भगव्या पताकांनी सजवत कानडी ग्रामस्थांनी एकनाथ महाराज रेंढे यांच्याकडे वीणा सोपवली. गेल्या एक महिन्यापासून रेंढे महाराज यांचे विणावादन अखंडपणे सुरू आहे. पालखी सोहळ्याच्या नियमाप्रमाणे तंबूत राहात हरिनामाचा जप, पहाटेची काकड आरती कानडी ग्रामस्थांच्या सहकार्याने नियमितपणे सुरू असून, येत्या १० ऑगस्टपर्यंत जप चालणार आहे.बालपणापासून म्हणजे सुमारे ४५ वर्षांपासून मी विणेकरी म्हणून दरवर्षी अखंडपणे पालखी सोहळ्यात जात असतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्याची परंपरा खंडित झाल्याने मी एकाच ठिकाणी बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प केला आहे. पुढील वर्षी तरी दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू होऊन विठुरायाच्या दर्शनाला जाता यावे असे मागणं परमेश्वर चरणी घातले आहे.- एकनाथ महाराज रेंढे, विणेकरी, पिंपळगाव लेप 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीSocialसामाजिक