शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

झपाट्याने भूजल पातळी खालविल्याने नाशिकला ‘रेड अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:13 AM

ग्रामीण भागात भूजल सर्वेक्षण करून बोअरवेल करण्यासाठी तरी काही नियम आहेत, परंतु शहरी भागात मात्र तसे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे अनेक सोसायटी आणि बंगल्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात कूपनलिका होत आहेत. त्यातच जल पुनर्भरणाची कोणतीही व्यवस्था गांभीर्याने केली जात नाही. त्याचा सर्व परिणाम भूजल पातळीवर होत असून, त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. देशात झपाट्याने भूजल पातळी कमी होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक शहराचा क्रमांक लागला असून, शहर डेंझर झोनमध्ये गेल्याने आता तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा इशारा : तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश

नाशिक : ग्रामीण भागात भूजल सर्वेक्षण करून बोअरवेल करण्यासाठी तरी काही नियम आहेत, परंतु शहरी भागात मात्र तसे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे अनेक सोसायटी आणि बंगल्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात कूपनलिका होत आहेत. त्यातच जल पुनर्भरणाची कोणतीही व्यवस्था गांभीर्याने केली जात नाही. त्याचा सर्व परिणाम भूजल पातळीवर होत असून, त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. देशात झपाट्याने भूजल पातळी कमी होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक शहराचा क्रमांक लागला असून, शहर डेंझर झोनमध्ये गेल्याने आता तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात चार कलमी कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली आहे.केवळ भूजल पातळीचा उपसा हेच कारण नाही तर वाहणारे पाणी थांबविण्याची आणि ते मुरवण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्याचादेखील मोठा परिणाम झाला आहे. एज टू एज रस्ते रुंदीकरण करण्यामुळे रस्त्याच्याकडेला असलेल्या मातीतून पाणी झिरपणे बंद झाले आहे. सोसायटी किंवा बंगल्याच्या आवारात फरशा किंवा पेव्हर ब्लॉक टाकल्यानेदेखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी वाहून नदीला मिळते, परंतु मुरत नाही अशी मोठी अडचण असून त्या पार्श्वभूमीवर आता विविध उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.महापालिकेचे आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या माहितीनुसार चार कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरात घर किंवा इमारत बांधकाम परवानगी घेताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती असली तरी प्रत्यक्षात मात्र नगण्य स्वरूपातच अशी व्यवस्था केली जाते त्यामुळे खासगी विशेषत: पाचशे चौरस मीटरवरील मिळकतींचे रेन वॉटर हार्वेस्टिंग तपासण्याबरोबरच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.शहराला तीन धरणांमधून पाणीपुरवठा होत असला तरी वापराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी बोअरवेल करण्याचे प्रमाण बेहिशोबी वाढल्याने भूजल पातळी इतकी घटली आहे की, झपाट्याने भूजल पातळी घटणाºया शहरांमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेच, परंतु चार महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रमदेखील आखून दिला आहे. त्यामुळे महापालिकेला युद्धपातळीवर काम करण्याची गरज निर्माण झाला आहे.तथापि, त्याआधी महापालिकेच्या इमारतींची तपासणी करून त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई