शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी वाचनात ठीक, गणितात जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:51 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या ‘असर’ संस्थेने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभागाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या ‘असर’ संस्थेने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभागाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. गणितात विद्यार्थी अपेक्षित प्रगती करू शकलेले नाही, तर वाचनामध्ये अजूनही प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. संस्थेच्या अहवालातील आकडे अगदीच कमी नसले तरी वाचन आणि गणितात ५० टक्केदेखील आकडेवारी नसल्याने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची चिंता नक्कीच वाढणार आहे.मागील तीन वर्षांपासून राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला जातो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासंदर्भातील हा अहवाल असून, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणपद्धतीवर यात अभ्यास करण्यात आला आहे. संस्कार आणि शिक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा स्तर विचारात घेतला जातो. यंदादेखील सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ‘अ‍ॅन्युअल स्टेट््स आॅफ एज्युकेशन रिपोर्ट’ अर्थात ‘असर’ या संस्थेने केलेल्या पाहणीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ३.५ टक्के इतके आहे, तर वाचनामध्ये जिल्हा परिषदेतील शाळांमधील मुलांची प्रगती समाधानकारक आहे. इयत्ता तिसरी ते पाचवीमधील ६१.५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची क्षमता आहे, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या ८१.२ मुलांना वाचता येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.या उलट परिस्थिती मात्र गणिताची आहे. गणितामध्ये अद्यापही मुलांनी अपेक्षित रूची दाखविलेली नाही. जवळपास ४२.३ टक्के मुलांना वजाबाकी करता येत नाही, तर ३२.१ टक्के विद्यार्थी अद्यापही भागाकार करू शकत नसल्याचे वास्तव समोर आलेले आहे.शैक्षणिक हब म्हणून नाशिकच्या शिक्षणविभागाकडे पाहिले जात असताना गणितामध्ये विद्यार्थी बेअसर झाल्याचे दिसून आले.चार टप्प्यांत सर्वेक्षणशिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाºया सामाजिक संस्थेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जातो. राष्टÑीय पातळीवर ही पाहणी केली जाते. महाराष्टÑात ३३ जिल्ह्यांतील ९९० गावांमधील ११ हजार ७६५ घरांमध्ये करण्यात आले आहे. जानेवारी ते एप्रिल २०१८ पर्यंत अध्ययनस्तर निश्चितीचे चार टप्पे तसेच या सत्रात दोन टप्पे करून अध्ययनस्तर निश्चितीनंतर कृती कार्यक्रम व त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका, केंद्रनिहाय मंथन सभा घेण्यात आल्या आहेत. विशेषत: वाचन आणि गणित विषयावर अहवाल देण्यात आलेला आहे.शिक्षक व विद्यार्थी या दोन घटकांच्या बरोबरीने अधिकाºयांची भूमिकादेखील महत्त्वाची असल्याने या तीनही घटकांच्या गुणवत्ता तपासणीसाठी उपक्रम राबविला जातो.  अधिकाºयांमध्ये शिक्षण विषयक जाणीव समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यामध्ये शाळा भेटी कशा कराव्यात याचे मार्गदर्शन केले जाते.  शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे निर्णय हे विद्यार्थीभिमुख असावे यासाठी शैक्षणिक स्तरावर गुणवत्ता पूर्ण अध्ययनाबाबत अभ्यास करण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा