शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी पोहचले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:17 IST

आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते.

आडगाव : आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. अचानक लागलेल्या आगीमुळे हातात असेल तेवढेच समान घेऊन प्रवासी बसमधून सुखरूपपणे बाहेर पडले असले तरी काही प्रवाशांचे मोबाइल गहाळ झाले तर काहींचे चप्पल, बूटदेखील जळून खाक झाले. त्यामुळे दोन अडीच तास ताटकळत जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी सकाळी घरी पोहचले.  नाशिक-इंदूर या मार्गावरील शिवशाही बस रविवारी रात्री आडगाव शिवारात अचानक आग लागून भस्मसात झाली. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. या बसमधील बहुतांशी प्रवासी दिवाळीची सुट्टी असल्याने नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते तर काही त्र्यंबकेश्वर, पंचवटी आणि शिर्डी येथे देवदर्शनाच्या निमित्ताने आले होते. या दरम्यान त्यांनी खरेदी केलेला प्रसाद, मौल्यवान वस्तू, कपडे सोबत होते. परंतु बसला लागलेल्या आगीमुळे त्यांना जीव वाचविण्यासाठी आपल्या जवळील किमती सामानावर पाणी सोडावे लागले.  आगीतून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. आग विझविण्यासाठी तासाचा कालावधी लोटला. या काळात सर्व प्रवाशांची तिकिटे, माहिती व साहित्याची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांनी पंचनामा केला.या काळात कुटुंबासह असलेल्या महिला प्रवाशांना रात्री दोन-अडीच तास हायवेवरच काढावे लागले. त्यानंतर पर्यायी दुसºया शिवशाही बसमधून या प्रवाशांची सोय करण्यात आली असली तरी, शिवशाही बसचा नुकताच आलेल्या अनुभवाचा विचार करता, नवीन बसमध्ये बसल्यानंतरही प्रवाशांनी सुरक्षेची प्रार्थना करत जीव  मुठीत धरून रात्रीचा पुढील प्रवास केला.आग प्रकरणाची चौकशी करणारशिवशाही बसच्या इन्व्हटर पॅनलला लागलेल्या आगप्रकरणाची तज्ज्ञांमार्फत चौकशी केली जाणार आहे. प्रथमदर्शनी आग लागल्याचे कारण दिसत असले तरी भविष्यात अशा प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी या घटनेची चौकशी केली जाईल. सदर बस ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर महामंडळाच्या सेवेसाठी चालविली जात होती. या चौकशीत चालकासह बसेसच्या तांत्रिक बाजूदेखील पडताळून पाहिल्या जातील, असे महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया यांनी सांगितले.आम्ही कुटुंबासह नाशिकला फिरण्यासाठी आलो होतो. रात्रीची बुकिंग असल्याने बसमध्ये आनंदात बसलो. पण अवघ्या काही मिनिटांत झालेल्या अपघातामुळे आम्ही घाबरलो. चप्पल, बूट आणि सोबत असलेले सर्व समान जळून खाक झाले. दुसºया बसमध्ये बसल्यानंतरदेखील धाकधूक वाटत होती पण सकाळी अनवाणी पायाने सुखरूप घरी पोहचलो.  - सुनील सोळंकी, प्रवासी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळShivshahiशिवशाहीfireआग