शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी पोहचले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:17 IST

आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते.

आडगाव : आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. अचानक लागलेल्या आगीमुळे हातात असेल तेवढेच समान घेऊन प्रवासी बसमधून सुखरूपपणे बाहेर पडले असले तरी काही प्रवाशांचे मोबाइल गहाळ झाले तर काहींचे चप्पल, बूटदेखील जळून खाक झाले. त्यामुळे दोन अडीच तास ताटकळत जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी सकाळी घरी पोहचले.  नाशिक-इंदूर या मार्गावरील शिवशाही बस रविवारी रात्री आडगाव शिवारात अचानक आग लागून भस्मसात झाली. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. या बसमधील बहुतांशी प्रवासी दिवाळीची सुट्टी असल्याने नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते तर काही त्र्यंबकेश्वर, पंचवटी आणि शिर्डी येथे देवदर्शनाच्या निमित्ताने आले होते. या दरम्यान त्यांनी खरेदी केलेला प्रसाद, मौल्यवान वस्तू, कपडे सोबत होते. परंतु बसला लागलेल्या आगीमुळे त्यांना जीव वाचविण्यासाठी आपल्या जवळील किमती सामानावर पाणी सोडावे लागले.  आगीतून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. आग विझविण्यासाठी तासाचा कालावधी लोटला. या काळात सर्व प्रवाशांची तिकिटे, माहिती व साहित्याची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांनी पंचनामा केला.या काळात कुटुंबासह असलेल्या महिला प्रवाशांना रात्री दोन-अडीच तास हायवेवरच काढावे लागले. त्यानंतर पर्यायी दुसºया शिवशाही बसमधून या प्रवाशांची सोय करण्यात आली असली तरी, शिवशाही बसचा नुकताच आलेल्या अनुभवाचा विचार करता, नवीन बसमध्ये बसल्यानंतरही प्रवाशांनी सुरक्षेची प्रार्थना करत जीव  मुठीत धरून रात्रीचा पुढील प्रवास केला.आग प्रकरणाची चौकशी करणारशिवशाही बसच्या इन्व्हटर पॅनलला लागलेल्या आगप्रकरणाची तज्ज्ञांमार्फत चौकशी केली जाणार आहे. प्रथमदर्शनी आग लागल्याचे कारण दिसत असले तरी भविष्यात अशा प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी या घटनेची चौकशी केली जाईल. सदर बस ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर महामंडळाच्या सेवेसाठी चालविली जात होती. या चौकशीत चालकासह बसेसच्या तांत्रिक बाजूदेखील पडताळून पाहिल्या जातील, असे महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया यांनी सांगितले.आम्ही कुटुंबासह नाशिकला फिरण्यासाठी आलो होतो. रात्रीची बुकिंग असल्याने बसमध्ये आनंदात बसलो. पण अवघ्या काही मिनिटांत झालेल्या अपघातामुळे आम्ही घाबरलो. चप्पल, बूट आणि सोबत असलेले सर्व समान जळून खाक झाले. दुसºया बसमध्ये बसल्यानंतरदेखील धाकधूक वाटत होती पण सकाळी अनवाणी पायाने सुखरूप घरी पोहचलो.  - सुनील सोळंकी, प्रवासी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळShivshahiशिवशाहीfireआग