शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी पोहचले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:17 IST

आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते.

आडगाव : आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. अचानक लागलेल्या आगीमुळे हातात असेल तेवढेच समान घेऊन प्रवासी बसमधून सुखरूपपणे बाहेर पडले असले तरी काही प्रवाशांचे मोबाइल गहाळ झाले तर काहींचे चप्पल, बूटदेखील जळून खाक झाले. त्यामुळे दोन अडीच तास ताटकळत जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी सकाळी घरी पोहचले.  नाशिक-इंदूर या मार्गावरील शिवशाही बस रविवारी रात्री आडगाव शिवारात अचानक आग लागून भस्मसात झाली. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. या बसमधील बहुतांशी प्रवासी दिवाळीची सुट्टी असल्याने नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते तर काही त्र्यंबकेश्वर, पंचवटी आणि शिर्डी येथे देवदर्शनाच्या निमित्ताने आले होते. या दरम्यान त्यांनी खरेदी केलेला प्रसाद, मौल्यवान वस्तू, कपडे सोबत होते. परंतु बसला लागलेल्या आगीमुळे त्यांना जीव वाचविण्यासाठी आपल्या जवळील किमती सामानावर पाणी सोडावे लागले.  आगीतून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. आग विझविण्यासाठी तासाचा कालावधी लोटला. या काळात सर्व प्रवाशांची तिकिटे, माहिती व साहित्याची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांनी पंचनामा केला.या काळात कुटुंबासह असलेल्या महिला प्रवाशांना रात्री दोन-अडीच तास हायवेवरच काढावे लागले. त्यानंतर पर्यायी दुसºया शिवशाही बसमधून या प्रवाशांची सोय करण्यात आली असली तरी, शिवशाही बसचा नुकताच आलेल्या अनुभवाचा विचार करता, नवीन बसमध्ये बसल्यानंतरही प्रवाशांनी सुरक्षेची प्रार्थना करत जीव  मुठीत धरून रात्रीचा पुढील प्रवास केला.आग प्रकरणाची चौकशी करणारशिवशाही बसच्या इन्व्हटर पॅनलला लागलेल्या आगप्रकरणाची तज्ज्ञांमार्फत चौकशी केली जाणार आहे. प्रथमदर्शनी आग लागल्याचे कारण दिसत असले तरी भविष्यात अशा प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी या घटनेची चौकशी केली जाईल. सदर बस ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर महामंडळाच्या सेवेसाठी चालविली जात होती. या चौकशीत चालकासह बसेसच्या तांत्रिक बाजूदेखील पडताळून पाहिल्या जातील, असे महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया यांनी सांगितले.आम्ही कुटुंबासह नाशिकला फिरण्यासाठी आलो होतो. रात्रीची बुकिंग असल्याने बसमध्ये आनंदात बसलो. पण अवघ्या काही मिनिटांत झालेल्या अपघातामुळे आम्ही घाबरलो. चप्पल, बूट आणि सोबत असलेले सर्व समान जळून खाक झाले. दुसºया बसमध्ये बसल्यानंतरदेखील धाकधूक वाटत होती पण सकाळी अनवाणी पायाने सुखरूप घरी पोहचलो.  - सुनील सोळंकी, प्रवासी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळShivshahiशिवशाहीfireआग