शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ममदापूर परिसरात वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:18 AM

येथे वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावातील टॅँकरची खेप वाढविण्याची मागणी होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये मागणी केल्यावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करण्यात आला, परंतु सदर टॅँकरची क्षमता आठ हजार लिटरची असल्याने गावातील लोकांना जास्त पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ममदापूर : येथे वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावातील टॅँकरची खेप वाढविण्याची मागणी होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये मागणी केल्यावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करण्यात आला, परंतु सदर टॅँकरची क्षमता आठ हजार लिटरची असल्याने गावातील लोकांना जास्त पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  वारंवार मागणी करूनदेखील अद्यापही टॅँकरची खेप वाढविण्यात आली नाही. तसेच बेंडके वस्ती, केरे वस्ती, गिडगे वस्ती खडकी या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. तांडा वस्तीवर टॅँकर सुरू झाल्याने उसतोडी करून तांड्यावर परत आलेल्या ग्रामस्थांमध्ये खुशी असून, इतर वस्तीवरील शेतकरीवर्गाचा केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे गावातील कुठल्याही विहिरीत पाणी नाही. ग्रामपंचायत मालकीची विहीर कोरडी असल्याने जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  वाडी-वस्तीकडे सगळ्या यंत्रणेचे लक्ष कमी असल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी छोटा टॅँकर सुरू असून, बाहेरगावी उसतोडीसाठी गेलेले सर्व लोक गावात परतल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी पंचाईत झाली आहे. ग्रामसेवक भगवान गायके यांनी गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ठराव केला तेव्हा वाडी- वस्तीसाठीदेखील ठराव केला मग गाव आणि वस्ती असा भेदभाव कसा? गावातील लोकांना पाणी आहे मग वाडी-वस्तीवर पाण्याची काहीच गरज नाही का ? असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे.  ममदापूर येथील ग्रामस्थांचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या परिसरातील मेळाचा बंधारा होणं गरजेचं असून तो झाला तर परिसरातील पाच ते सहा गावांतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकते. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी याबाबत लक्ष घालून उन्हाळ्याचे राहिलेले पंधरा ते वीस दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.साठवलेले पाणी झाले पिवळेशेतकरीवर्गाने आपल्या शेतातील विहिरीत जानेवारी महिन्यात साठवलेले पाणी सध्या पिवळ्या रंगाचे झाले असून, तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. वाडी-वस्तीकडे सगळ्यांचे दुर्लक्ष असून, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरविषयी विचारले असता टॅँकर उद्या सुरू होईल असे सांगितले जाते. परिसरातील विहिरीना पाणी कमी असल्याने बऱ्याच ठिकाणांहून महिलांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असल्याने सर्व स्तरातून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध व्यक्त केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी नाशिक येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या पथकाने पाहणी करूनदेखील अद्याप वाडी-वस्तीवर टॅँकर चालू झालेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई