शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शहीद केशव गोसावी यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे : वीरपत्नी यशोदा

By अझहर शेख | Updated: January 5, 2019 18:06 IST

तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्दे नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुलभ होईल,...अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी असलेल्या गोसावी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा लान्सनायक केशव सोमगीर गोसावी याने देशासाठी हौतात्म्य पत्कारले. त्यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी केली आहे.

नव्या वर्षाची नवी सुरूवात म्हणून शहरातील गंगापूररोड येथे राहणाऱ्या वीरपत्नी रेखा खैरनार यांच्या घरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नींसह माजी सैनिकांच्या पत्नींचा घरगुती मेळावा शनिवारी (दि.५) झाला. यावेळी गोसावी उपस्थित होत्या.

त्या म्हणाल्या, माझे पती शहीद केशव हे आमच्या कुटुंबाचे आधारवड होते. त्यांच्या बलिदानाचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. त्यांचे बलिदान हे सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, तसेच आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांच्या बलिदानाच्या बदल्यात भारतीय सेना पाकिस्तान व जम्मु-काश्मिरमध्ये घुसखोरी करणा-या आतंकवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे ती सरकारने सेनेचे हात बळकट करण्याची.शहीद केशव यांच्या पार्थिवावर गावात जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे लवकरात लवकर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारावे आणि येत्या स्वातंत्र्यदिनाला त्यांच्या स्मारकावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यादृष्टीने अद्याप कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. तसेच शासकिय कार्यालयात लिपिक म्हणून मला नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अधिक सुलभ होईल, त्यामुळे सरकारने माझ्या नोकरीचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा असतो; मात्र सैन्यदलातील जवानांच्या संरक्षणासाठीदेखील भारतीय सेनेला अत्यावश्यक सोयीसुविधा व अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरविणे गरजेचे आहे. सरकारने भारतीय सेनेचा विश्वास वेळोवेळी उंचावून जवानांची ताकद वाढवावी, अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल, असेही वीरपत्नी यशोदा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिकMartyrशहीदIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर