शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

शहीद केशव गोसावी यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे : वीरपत्नी यशोदा

By अझहर शेख | Updated: January 5, 2019 18:06 IST

तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्दे नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुलभ होईल,...अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी असलेल्या गोसावी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा लान्सनायक केशव सोमगीर गोसावी याने देशासाठी हौतात्म्य पत्कारले. त्यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी केली आहे.

नव्या वर्षाची नवी सुरूवात म्हणून शहरातील गंगापूररोड येथे राहणाऱ्या वीरपत्नी रेखा खैरनार यांच्या घरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नींसह माजी सैनिकांच्या पत्नींचा घरगुती मेळावा शनिवारी (दि.५) झाला. यावेळी गोसावी उपस्थित होत्या.

त्या म्हणाल्या, माझे पती शहीद केशव हे आमच्या कुटुंबाचे आधारवड होते. त्यांच्या बलिदानाचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. त्यांचे बलिदान हे सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, तसेच आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांच्या बलिदानाच्या बदल्यात भारतीय सेना पाकिस्तान व जम्मु-काश्मिरमध्ये घुसखोरी करणा-या आतंकवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे ती सरकारने सेनेचे हात बळकट करण्याची.शहीद केशव यांच्या पार्थिवावर गावात जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे लवकरात लवकर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारावे आणि येत्या स्वातंत्र्यदिनाला त्यांच्या स्मारकावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यादृष्टीने अद्याप कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. तसेच शासकिय कार्यालयात लिपिक म्हणून मला नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अधिक सुलभ होईल, त्यामुळे सरकारने माझ्या नोकरीचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा असतो; मात्र सैन्यदलातील जवानांच्या संरक्षणासाठीदेखील भारतीय सेनेला अत्यावश्यक सोयीसुविधा व अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरविणे गरजेचे आहे. सरकारने भारतीय सेनेचा विश्वास वेळोवेळी उंचावून जवानांची ताकद वाढवावी, अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल, असेही वीरपत्नी यशोदा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिकMartyrशहीदIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर