शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

त्र्यंबकला पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 11:21 PM

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे.

ठळक मुद्देमनमाडला ढगाळ पावसाळी वातावरण

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे. पाऊस ढगफुटी झाल्याप्रमाणे धुंवाधार कोसळत नुकसान करत आहे. वसाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. अचानक आलेल्या पावसाने ओहळ वाहायला लागले आणि शेतात सोंगून (कापणी केलेले) ठेवलेले भात पाण्यात भिजले आहे. शिवारात सर्वत्र अवकाळीच्या तडाख्यातून पीक वाचविण्याची लगबग दिसून येत आहे.नांदगावी जनजीवन विस्कळीतनांदगांव : बेमोसमी पावसाने दुपारी दोन वाजेनंतर वातावरणात प्रचंड गारठा पसरला असून थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे .दुपारी सुमारे एक तास ढगाळ वातावरणात झिम झिम पाऊस कोसळत होता, कोसळणाऱ्या पावसाचे थेंब अत्यंत गारांसारखे थंड लागत होते.हवेतील गारवा वाढत गेल्याने थंडीचा कडाका वाढत गेला आणि सायंकाळी ६ वाजेनंतर वाढत्या गारठ्यात पुन्हा पावसाचे थेंब कोसळत होते. थंडीमुळे शहरातील व ग्रामीण भागातिल लहान मोठे व्यावसायिक सायंकाळ होताच बंद करुन लवकरच घरी गेले.मनमाडला ढगाळ पावसाळी वातावरणमनमाड : ऐन हिवाळ्यात ढगाळ पावसाळी वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून या प्रतिकूल हवामानाचा थेट परिणाम कांदे,भाजीपाला आणि पिकांवर होत असल्याने निसर्गापुढे शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाले आहेत . मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ पावसाळी वातावरण होते . बुधवारी सकाळपासून तर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या.या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले . 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी