शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नाशिकरोड परिसरात पाऊस; कार्यकर्त्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:11 IST

वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

नाशिकरोड : वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.यंदा पावसाळा ऋतुमध्ये म्हणावा तसा पाऊस न पडल्याने शेतकरी वर्गात थोडेसे चिंतेचे वातावरण आहे. श्रावण महिन्यातदेखील नेहमीप्रमाणे पाऊस न पडल्याने ऐन गणेशोत्सव-नवरात्रीत पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. गेल्या २०-२२ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून नाशिकरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू राहिल्यामुळे सायंकाळपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. तर पादचारी, दुचाकी चालकांना पावसामुळे आजुबाजूला आडोसा घ्यावा लागला होता.पावसाच्या संततधारेमुळे रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी थोड्या प्रमाणात वाहत होते. जवळपास वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते.कार्यकर्त्यांमध्ये नाराजीगणेशोत्सव मंडळांना लागू केलेल्या जाचक अटींमुळे मंडळांची रोडावलेली संख्या, वाढती महागाई, अनुत्साह आदी कारणांमुळे नाशिकरोड परिसरात हातावर मोजण्याइतकेच मोठे गणेशोत्सव मंडळे राहिली आहेत. मंडळाचा देखावा कार्यकर्त्यांनी पूर्ण साकारण्यात दोन-तीन दिवस गेल्यानंतर घरोघरी गौरी-गणपतीमुळे देखावे बघण्यास म्हणावी तशी गर्दी झाली नव्हती. गणेशोत्सवास शेवटचे पाचच दिवस शिल्लक असताना दुपारपासून पावसाचे आगमन सुरू झाले होते. सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे व पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे भाविक देखावे बघण्यास घराबाहेर न पडल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्यात सुरू झालेल्या पावसामुळे कार्यकर्ते व भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.एकलहऱ्यात हलक्या सरीएकलहरे : परिसरात आज दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून कडक ऊन पडलेले होते. दुपारनंतर आभाळात काळ्या ढगांनी गर्दी केली व संपूर्ण पंचक्रोशीत पावसाचे वातावरण तयार झाले. साडेचारच्या सुमारास बºयापैकी पाऊस कोसळला; मात्र दहा मिनिटातच त्याचा जोर कमी झाला. अधूनमधून कोसळणाºया या सरींमुळे सर्वत्र जमिनीत ओल निर्माण झाली असून, आणि हवेत गारठा जाणवू लागला. या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना जीवदान मिळाले.

टॅग्स :RainपाऊसGaneshotsavगणेशोत्सव