शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

नाशिकरोड परिसरात पाऊस; कार्यकर्त्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:11 IST

वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

नाशिकरोड : वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.यंदा पावसाळा ऋतुमध्ये म्हणावा तसा पाऊस न पडल्याने शेतकरी वर्गात थोडेसे चिंतेचे वातावरण आहे. श्रावण महिन्यातदेखील नेहमीप्रमाणे पाऊस न पडल्याने ऐन गणेशोत्सव-नवरात्रीत पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. गेल्या २०-२२ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून नाशिकरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू राहिल्यामुळे सायंकाळपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. तर पादचारी, दुचाकी चालकांना पावसामुळे आजुबाजूला आडोसा घ्यावा लागला होता.पावसाच्या संततधारेमुळे रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी थोड्या प्रमाणात वाहत होते. जवळपास वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते.कार्यकर्त्यांमध्ये नाराजीगणेशोत्सव मंडळांना लागू केलेल्या जाचक अटींमुळे मंडळांची रोडावलेली संख्या, वाढती महागाई, अनुत्साह आदी कारणांमुळे नाशिकरोड परिसरात हातावर मोजण्याइतकेच मोठे गणेशोत्सव मंडळे राहिली आहेत. मंडळाचा देखावा कार्यकर्त्यांनी पूर्ण साकारण्यात दोन-तीन दिवस गेल्यानंतर घरोघरी गौरी-गणपतीमुळे देखावे बघण्यास म्हणावी तशी गर्दी झाली नव्हती. गणेशोत्सवास शेवटचे पाचच दिवस शिल्लक असताना दुपारपासून पावसाचे आगमन सुरू झाले होते. सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे व पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे भाविक देखावे बघण्यास घराबाहेर न पडल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्यात सुरू झालेल्या पावसामुळे कार्यकर्ते व भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.एकलहऱ्यात हलक्या सरीएकलहरे : परिसरात आज दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून कडक ऊन पडलेले होते. दुपारनंतर आभाळात काळ्या ढगांनी गर्दी केली व संपूर्ण पंचक्रोशीत पावसाचे वातावरण तयार झाले. साडेचारच्या सुमारास बºयापैकी पाऊस कोसळला; मात्र दहा मिनिटातच त्याचा जोर कमी झाला. अधूनमधून कोसळणाºया या सरींमुळे सर्वत्र जमिनीत ओल निर्माण झाली असून, आणि हवेत गारठा जाणवू लागला. या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना जीवदान मिळाले.

टॅग्स :RainपाऊसGaneshotsavगणेशोत्सव