शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

गारव्यामुळे रब्बीची पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:22 PM

गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

नायगाव : गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतआहेत.  गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरणात सध्या चांगल्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र नजरेस पडत आहे. आठवड्यापासून निर्माण झालेल्या गारव्यामुळे शेतातील रब्बीच्या सर्वच पिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे.  डिसेंबर महिन्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे गहू, कांदा, टमाटे, ज्वारी आदींसह विविध पिकांवर अनेक रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे पिकांना रोगांपासून वाचवण्यासाठी शेतकºयांवर महागडी किटकनाशके फवारण्याची वेळ आली होती.  सततच्या ढगाळ हवामानात अनेकदा फवारणी करूनही रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी बोलत आहेत. उत्पादन वाढीस मदत गेल्या सहा-सात दिवसांपासून थंडीची चाहूल लागल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. थंडीचे आगमन होताच शेतातील सर्वच पिके तरारू लागली आहेत. या वाढत्या थंडीमुळे पिकांवरील मावा, तुडतुडे, चिकटा बिना फवारणीचा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. वाढलेली थंडी आणखी काही दिवस अशीच राहून वातावरणातील गारवा असाच टिकून राहिल्यास उत्पादन वाढीसही मदत होईल, असेही शेतकरी सांगत आहेत.

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी