शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

रब्बी पिकांना नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:41 PM

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देकुठे हर्ष कुठे चिंता : येवला तालुक्यात शेतकामांना वेग; थंडीने द्राक्षबागा धोक्यात

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक , मानोरी खुर्द, शिरसगाव लौकी, नेऊरगाव, जळगाव नेउर, मुखेड आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड झाली असून, अनेक ठिकाणी पुढील दहा ते बारा दिवसांत द्राक्षतोडणीस सुरु वात होणार आहे. फळतोडणीस आल्याने व्यापारी वर्गाकडून द्राक्षांचे दर ठरविणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अचानक थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने द्राक्षबागेला धोका निर्माण झाला आहे. पहाटे दवबिंदूदेखील जास्त प्रमाणात पडत असून, हे दवबिंदू द्राक्षफळावर जास्त वेळ साचून राहत असल्याने द्राक्षफळ खराब होण्याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.रब्बी हंगामातील उन्हाळ कांदे, गहू , हरभरा, ज्वारी आदी पिकांना ही थंडी लाभदायी असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात सातत्याने बदल झाल्याने रब्बी पिके आणि द्राक्षबागा संकटात सापडलेल्या होत्या. त्यामुळे जवळपास महिनाभर रब्बी हंगामातील पिकांवर आणि द्राक्षबागेवर औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर ओढवली होती. वातावरण बदलामुळे औषध फवारणी खर्चात भरसमसाठ वाढ झाली असून, त्यात ऐन द्राक्षतोडणीला थंडीची लाट तीव्र असल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी चिंता व्यक्त होत आहे.बागा वाचवण्यासाठी लाखोंचा खर्चमागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळी स्थितीत अनेक शेतकºयांनी कुºहाड चालवत द्राक्षबागा भुईसपाट केल्या होत्या. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने शेतकरीवर्गाने द्राक्षबागा पुन्हा फुलवल्या आहेत. वर्षातून एकदाच बागेतून उत्पादन निघत असल्याने बाग जगविण्यासाठी लाखो रु पयांचा खर्च येत असतो. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने औषध फवारणी करून द्राक्षबागा वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. मात्र, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे बोलले जात असल्याने याचा परिणाम द्राक्षमण्यांवर होणार आहे. यामुळे द्राक्षाच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शेकोट्या पेटू लागल्याथंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. संध्याकाळी सहा वाजेपासून तरुण, आबालवृद्ध शेकोटीभोवती बसून गप्पा मारताना दिसत आहे. बाजारामध्ये उबदार कपडे मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल झाले आहे. मागणी असल्याने महागड्या दराने उबदार कपड्यांची विक्री होत आहे. थंडीने रु ग्णसंख्येत वाढ झाली असून, दवाखान्यात गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन