शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 23, 2015 00:19 IST

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच प्रश्नचिन्ह

नाशिक : चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक व तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच परीक्षार्थी उमेदवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण होऊन परिणामी या परीक्षेचा निकाल खोळंबला आहे. उमेदवारांनी पुराव्यानिशी नोंदविलेल्या हरकतींमुळे प्रश्नपत्रिकेच्या तपासणीतही अडथळे निर्माण होऊन गुणपत्रक लांबणीवर पडले आहे. जिल्ह्णातील तलाठ्यांची रिक्त पदे व लिपिकांची पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहिरातीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले असता, या पदांसाठी इच्छुक असलेल्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने या दोन्ही पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेण्याचे निश्चित केले व त्याची सारी धुरा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी उचलली. हजारोंच्या संख्येने परीक्षार्थी असल्यामुळे एका खासगी कंपनीला या परीक्षेच्या साऱ्या तयारीचा ठेका देण्यात येऊन फक्त प्रश्नपत्रिका काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे ठेवले. त्यामुळे पुरेपूर गोपनीयता पाळत या परीक्षेची प्रश्नपत्रिका काढण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला असला तरी, त्याविषयीही काहींनी त्याचवेळी शंका उपस्थित करून प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चाही रंगली होती, तथापि त्याचे ठोस पुरावे समोर आले नाहीत. मात्र आता परीक्षा संपल्यानंतर त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर काही उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. लिपिक पदासाठी भाषा, गणित, सामान्यज्ञान व समाजशास्त्र अशा चार विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेनंतर तिसऱ्या दिवशी प्रशासनाने या प्रश्नपत्रिकेची उत्तरे जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी उमेदवारांनी त्याची पडताळणी केली असता, प्रशासनाने विचारलेल्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे असल्याचे लक्षात आले. प्रशासनाला अपेक्षित असलेल्या उत्तरांपेक्षा उमेदवारांनी केलेल्या अभ्यासात वेगळी उत्तरे असल्याचे पुरावे गोळा करीत वीस उमेदवारांनी सात प्रश्नांना आक्षेप नोंदविले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी लेखी स्वरूपात हरकती दाखल करून, स्पष्टीकरण मागितल्याने या परीक्षेच्या निकालावरही त्याचे परिणाम झाले आहेत. ज्या उमेदवारांनी हरकती नोंदविल्या, त्यांचे समाधान करण्याबरोबरच जर प्रश्नच चुकीचा असेल, तर उमेदवारांना त्या त्या प्रश्नांचे गुण बहाल करावे लागणार आहेत. उमेदवारांच्या या हरकतींमुळे अचूक प्रश्नपत्रिका काढल्याचा प्रशासनाचा दावा यामुळे फोल ठरला आहे.