शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

समृद्धीबाधित रब्बी हंगामाला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:18 AM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी गेल्या दीड वर्षापासून थेट जागा खरेदीची तयारी सुरू असतानाही खरीप व रब्बी हंगामाची पिके घेणाऱ्या जिल्ह्यातील समृद्धीबाधित शेतकºयांना यंदापासून दोन्ही हंगामाला मुकावे लागणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीनंतर जागा हस्तांतरण काम सुरू करण्याची घाई

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी गेल्या दीड वर्षापासून थेट जागा खरेदीची तयारी सुरू असतानाही खरीप व रब्बी हंगामाची पिके घेणाऱ्या जिल्ह्यातील समृद्धीबाधित शेतकºयांना यंदापासून दोन्ही हंगामाला मुकावे लागणार आहे. महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात ९० टक्के जागा मिळाल्यामुळे दिवाळीनंतर काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराकडे जागा हस्तांतरण करण्याची तयारी सुरू झाल्याने शेतकºयांना रब्बीच्या पेरणीपासून रोखण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतील ४९ गावांमधून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार असल्याने महामार्गासाठी शेतकºयांकडून पाच पट दराने थेट जमिनीची खरेदी गेल्या दीड वर्षापासून केली जात आहे. प्रारंभी महामार्गाला व जागा देण्यास विरोध करणाºया शेतकºयांनी कालांतराने जमीन विक्रीची संमती दिल्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के जागा ताब्यात मिळाली आहे. उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी सक्तीने भूसंपादन करण्याच्या नोटिसा दहा टक्के शेतकºयांना धाडण्यात आल्या आहेत. ज्या शेतकºयांनी स्वखुशीने जागा दिली त्या जागेची मोजणी करून त्यांना मोबदला अदा करण्यात आला असला तरी, त्या शेतजमिनीचा ताबा अप्रत्यक्ष शेतकºयांकडेच असल्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामाची पिके घेतली. हे करीत असताना महामार्गासाठी करण्यात आलेल्या संयुक्त मोजणीसाठी शेतजमिनीवर करण्यात आलेल्या खुणादेखील त्यांनी नष्ट करून टाकल्या आहेत. आता मात्र दिवाळीनंतर सरकारने प्रत्यक्ष या कामाची सुरुवात करण्याचे जाहीर करून त्यासाठी ठेकेदारही निश्चित केले आहे. नाशिक जिल्ह्णात तीन ठेकेदारांकरवी हे काम केले जाणार आहे. त्यात पाथरे ते सोनारी, सोनांबे ते तारांगणपाडा व तारांगणपाडा ते ठाणे अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. दिवाळीनंतर ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याने शेतकºयांना नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रब्बीची पेरणी करता येणार नसून, तशा सूचना शेतकºयांना देण्यात आल्या आहेत.ताब्यात असलेल्या जमिनींचे लवकरच हस्तांतरणगेल्या आठवड्यातच ठेकेदाराच्या पथकाने जमिनीची पाहणी केली असून, सध्या रस्ते महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे लवकरच ठेकेदाराकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जमिनीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करण्यात होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी