शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

बंधारा दुरु स्ती केल्याने मिटला गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 4:29 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जऊळके येथील अनेक दिवसापासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा सहा लक्ष रु पये खर्च करून दुरु स्त झाल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

ठळक मुद्दे बंधाºयातील गाळ काढुन खोलीकरण

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जऊळके येथील अनेक दिवसापासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा सहा लक्ष रु पये खर्च करून दुरु स्त झाल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.येथील गावालगत असलेला बंधारा भरला तर गावातील बोअरवेल सह आसपासच्या विहिरींना पाणी उतरते पण दरवर्षी पावसाने बंधारा दोन्ही बाजुने फुटून पाणी वाहुन जात होते. त्यामुळे गावाला ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. ही समस्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर यांच्या लक्षात आणून देताच यांच्या प्रयत्नातून सहा लक्ष रु पये खर्च करून बंधाऱ्याची दुरु स्ती केली व बंधाºयातील गाळ काढुन खोलीकरण झाल्याने नुकतेच पालखेड डावा कालव्याच्या ओवरफ्लो आवर्तनातुन बंधारा भरल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक शांताराम सोनवणे, पांडुरंग जाधव, भाऊराव जाधव, प्रभाकर खैरनार, अमोल सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे, सावळीराम खैरनार, दिनकर दराडे यांनी बंधाºयाचे जलपूजन केले.जऊळके येथील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने अनेक दिवसापासून ग्रामस्थांची बंधारा दुरु स्तीचा प्रश्न मार्गी लागुन पालखेड डावा कालव्याच्या ओवरफ्लो आवर्तनातुन बंधारा भरल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने समाधान वाटले .- संजय बनकर, सभापती, कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, नाशिक. (फोटो ०४ जऊळके)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणी