शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:16 IST

त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.

ठळक मुद्दे तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.

वसंत तिवडेत्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.तेव्हा देखील संपुर्ण तालुक्यात तालुक्यातील मुख्य पिक भात नागली वरई उडीद खुरासणी ही पिके ब-यापैकी शेतकऱ्यांना लाभदायक ठरली. या वर्षी अद्याप ५० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. अद्यापही काम थांबलेले नाही. अजुन पेरणीचे काम बाकी असुन आता तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.येत्या आठ दिवसात संपुर्ण खरीप लागवड पुर्ण होईल. कृषी विभागाच्या आतापर्यंत झालेल्या पेरणी लागवडीचा अहवाल पाहता भात एकुण सर्व साधारण क्षेत्र ९०५१ हेक्टर असून एकुण पेरणी २५४० हेक्टर, नागली सर्वसाधारण क्षेत्र ३०३० हेक्टर. एकुण पेरणी २६० हेक्टर,वरई एकुण सर्वसाधारण क्षेत्र ३५५७ हेक्टर, एकुण पेरणी १८२ हेक्टर. तूर १०१९ (सर्वसाधारण क्षेत्र) एकुण पेरणी ९५ हेक्टर. उडीद सर्वसाधारण क्षेत्र १६४८ हेक्टर. पेरणी ३४०२ हेक्टर. भुईमुग १४२ हेक्टर, खुरसणी ४८६ हेक्टर सोयाबीन ५ हेक्टर. ऊस ३९ हेक्टर अशा प्रकारे पेरणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुबार पेरणीची गरज नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाळी नक्षत्रे सुरु झाल्यानंतर मृग आर्द्रा ही नक्षत्रे कोरडी गेल्या नंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. तत्पुर्वी आर्द्रात एक चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या. नंतर पेरण्या झाल्या नाहीत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ६ जुलै पासुन तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. ९ जुलैपासून पाऊस जो थांबला तो आठदहा दिवस थांबला. पण पेरणी लागवड आज पर्यंत ५० टक्के पुर्ण झाली आहे.आठ दिवसाआधीच पेरण्या १०० टक्के पुर्ण होतील त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वी देखील दुबार पेरणी करावी लागली नाही आणि यावेळेस देखील दुबार पेरणीची आवश्यकता नाही.वेळुंजे ११४५ तर हरसुल ९९७ मिमि पावसाची सरासरी झाली आहे. संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी १२०४ मिमि झाल्यानंतर आता पेरणी लागवड खणणी, आवणीला वेग आला आहे.खणणी, आवणी करीता २०० ते २५० रु पये रोजंदारी मिळते. तर औतकरी यांना ५०० ते ७०० रु पये रोजंदारी दिली जाते. तसेच लवकर कामे आटोपण्याच्या दृष्टीने यांत्रिकी शेती म्हणुन ट्रॅक्टरद्वारे चिखल करणे, आळवट फिरवणे यासाठी ट्रॅक्टरची रोजंदारी चालकासह एका तासाला ८०० ते १००० रु पये मोजावे लागतात. तसेच शेतकºयाला शेतमजुरीसाठी मजुर आणण्यासाठी खाली कोकणात वरती साप्ते कोणे सोमनाथ नगर शिवाजीनगर वेळे वाघेरा गणेशगाव जातेगाव आदी गावांमधुन मजुर उपलब्ध असले तरच मिळतात. त्यांना आणणे व सायंकाळी घरी पोहविणे यासाठीची जबाबदारीही मालक शेतकºयाला घ्यावी लागते. बळीराजाने ताठ मानेने आपला कणा मोडुन देता आपला धीर खचु न देता अशा संकटाशी मुकाबला केला पाहिजे. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर अनेक संकटे येतात. पण तो परत उभा राहतोच ना? तसा शेतकºयाने टोकाचा विचार न करता परत आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे.- सुनील पोरजे,शेतकरी, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर.