शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:16 IST

त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.

ठळक मुद्दे तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.

वसंत तिवडेत्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.तेव्हा देखील संपुर्ण तालुक्यात तालुक्यातील मुख्य पिक भात नागली वरई उडीद खुरासणी ही पिके ब-यापैकी शेतकऱ्यांना लाभदायक ठरली. या वर्षी अद्याप ५० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. अद्यापही काम थांबलेले नाही. अजुन पेरणीचे काम बाकी असुन आता तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.येत्या आठ दिवसात संपुर्ण खरीप लागवड पुर्ण होईल. कृषी विभागाच्या आतापर्यंत झालेल्या पेरणी लागवडीचा अहवाल पाहता भात एकुण सर्व साधारण क्षेत्र ९०५१ हेक्टर असून एकुण पेरणी २५४० हेक्टर, नागली सर्वसाधारण क्षेत्र ३०३० हेक्टर. एकुण पेरणी २६० हेक्टर,वरई एकुण सर्वसाधारण क्षेत्र ३५५७ हेक्टर, एकुण पेरणी १८२ हेक्टर. तूर १०१९ (सर्वसाधारण क्षेत्र) एकुण पेरणी ९५ हेक्टर. उडीद सर्वसाधारण क्षेत्र १६४८ हेक्टर. पेरणी ३४०२ हेक्टर. भुईमुग १४२ हेक्टर, खुरसणी ४८६ हेक्टर सोयाबीन ५ हेक्टर. ऊस ३९ हेक्टर अशा प्रकारे पेरणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुबार पेरणीची गरज नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाळी नक्षत्रे सुरु झाल्यानंतर मृग आर्द्रा ही नक्षत्रे कोरडी गेल्या नंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. तत्पुर्वी आर्द्रात एक चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या. नंतर पेरण्या झाल्या नाहीत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ६ जुलै पासुन तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. ९ जुलैपासून पाऊस जो थांबला तो आठदहा दिवस थांबला. पण पेरणी लागवड आज पर्यंत ५० टक्के पुर्ण झाली आहे.आठ दिवसाआधीच पेरण्या १०० टक्के पुर्ण होतील त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वी देखील दुबार पेरणी करावी लागली नाही आणि यावेळेस देखील दुबार पेरणीची आवश्यकता नाही.वेळुंजे ११४५ तर हरसुल ९९७ मिमि पावसाची सरासरी झाली आहे. संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी १२०४ मिमि झाल्यानंतर आता पेरणी लागवड खणणी, आवणीला वेग आला आहे.खणणी, आवणी करीता २०० ते २५० रु पये रोजंदारी मिळते. तर औतकरी यांना ५०० ते ७०० रु पये रोजंदारी दिली जाते. तसेच लवकर कामे आटोपण्याच्या दृष्टीने यांत्रिकी शेती म्हणुन ट्रॅक्टरद्वारे चिखल करणे, आळवट फिरवणे यासाठी ट्रॅक्टरची रोजंदारी चालकासह एका तासाला ८०० ते १००० रु पये मोजावे लागतात. तसेच शेतकºयाला शेतमजुरीसाठी मजुर आणण्यासाठी खाली कोकणात वरती साप्ते कोणे सोमनाथ नगर शिवाजीनगर वेळे वाघेरा गणेशगाव जातेगाव आदी गावांमधुन मजुर उपलब्ध असले तरच मिळतात. त्यांना आणणे व सायंकाळी घरी पोहविणे यासाठीची जबाबदारीही मालक शेतकºयाला घ्यावी लागते. बळीराजाने ताठ मानेने आपला कणा मोडुन देता आपला धीर खचु न देता अशा संकटाशी मुकाबला केला पाहिजे. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर अनेक संकटे येतात. पण तो परत उभा राहतोच ना? तसा शेतकºयाने टोकाचा विचार न करता परत आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे.- सुनील पोरजे,शेतकरी, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर.