शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:16 IST

त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.

ठळक मुद्दे तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.

वसंत तिवडेत्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.तेव्हा देखील संपुर्ण तालुक्यात तालुक्यातील मुख्य पिक भात नागली वरई उडीद खुरासणी ही पिके ब-यापैकी शेतकऱ्यांना लाभदायक ठरली. या वर्षी अद्याप ५० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. अद्यापही काम थांबलेले नाही. अजुन पेरणीचे काम बाकी असुन आता तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.येत्या आठ दिवसात संपुर्ण खरीप लागवड पुर्ण होईल. कृषी विभागाच्या आतापर्यंत झालेल्या पेरणी लागवडीचा अहवाल पाहता भात एकुण सर्व साधारण क्षेत्र ९०५१ हेक्टर असून एकुण पेरणी २५४० हेक्टर, नागली सर्वसाधारण क्षेत्र ३०३० हेक्टर. एकुण पेरणी २६० हेक्टर,वरई एकुण सर्वसाधारण क्षेत्र ३५५७ हेक्टर, एकुण पेरणी १८२ हेक्टर. तूर १०१९ (सर्वसाधारण क्षेत्र) एकुण पेरणी ९५ हेक्टर. उडीद सर्वसाधारण क्षेत्र १६४८ हेक्टर. पेरणी ३४०२ हेक्टर. भुईमुग १४२ हेक्टर, खुरसणी ४८६ हेक्टर सोयाबीन ५ हेक्टर. ऊस ३९ हेक्टर अशा प्रकारे पेरणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुबार पेरणीची गरज नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाळी नक्षत्रे सुरु झाल्यानंतर मृग आर्द्रा ही नक्षत्रे कोरडी गेल्या नंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. तत्पुर्वी आर्द्रात एक चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या. नंतर पेरण्या झाल्या नाहीत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ६ जुलै पासुन तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. ९ जुलैपासून पाऊस जो थांबला तो आठदहा दिवस थांबला. पण पेरणी लागवड आज पर्यंत ५० टक्के पुर्ण झाली आहे.आठ दिवसाआधीच पेरण्या १०० टक्के पुर्ण होतील त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वी देखील दुबार पेरणी करावी लागली नाही आणि यावेळेस देखील दुबार पेरणीची आवश्यकता नाही.वेळुंजे ११४५ तर हरसुल ९९७ मिमि पावसाची सरासरी झाली आहे. संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी १२०४ मिमि झाल्यानंतर आता पेरणी लागवड खणणी, आवणीला वेग आला आहे.खणणी, आवणी करीता २०० ते २५० रु पये रोजंदारी मिळते. तर औतकरी यांना ५०० ते ७०० रु पये रोजंदारी दिली जाते. तसेच लवकर कामे आटोपण्याच्या दृष्टीने यांत्रिकी शेती म्हणुन ट्रॅक्टरद्वारे चिखल करणे, आळवट फिरवणे यासाठी ट्रॅक्टरची रोजंदारी चालकासह एका तासाला ८०० ते १००० रु पये मोजावे लागतात. तसेच शेतकºयाला शेतमजुरीसाठी मजुर आणण्यासाठी खाली कोकणात वरती साप्ते कोणे सोमनाथ नगर शिवाजीनगर वेळे वाघेरा गणेशगाव जातेगाव आदी गावांमधुन मजुर उपलब्ध असले तरच मिळतात. त्यांना आणणे व सायंकाळी घरी पोहविणे यासाठीची जबाबदारीही मालक शेतकºयाला घ्यावी लागते. बळीराजाने ताठ मानेने आपला कणा मोडुन देता आपला धीर खचु न देता अशा संकटाशी मुकाबला केला पाहिजे. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर अनेक संकटे येतात. पण तो परत उभा राहतोच ना? तसा शेतकºयाने टोकाचा विचार न करता परत आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे.- सुनील पोरजे,शेतकरी, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर.