शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त पुन्हा धरणात उड्या घेण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:00 IST

महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून

ठळक मुद्देकश्यपीप्रश्न : गंगापूरधरणात पाणी सोडण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्य कश्यपी धरणग्रस्तांचे पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सहभागी करून घेण्यास होणारा विलंब पाहता, पुन्हा एकवार पाचही गावातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, कश्यपी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटेपर्यंत गंगापूर धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवून प्रसंगी धरणाच्या पाण्यात उड्या घेण्याची तयारी चालविली आहे.दोन दिवसांपूर्वीच धोंडेगाव, देवरगाव, गोळशी, खड्याची वाडी येथील ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून घेतले असून, उर्वरित ३६ जणांना आजही प्रतीक्षा आहे. शिवाय धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. गेल्या वीस वर्षांपासून या संदर्भात सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून २०१६ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी थेट धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्यामुळे सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर शासकीय समिती गठीत करून त्याबाबत वारंवार बैठका झाल्या, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने गंगापूर धरणात जेमतेम ५६ टक्केच जलसाठा आहे, धरणाच्या पाण्यावर असलेले आवर्तन पाहता, लवकरच कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने सुरू केले असून, कश्यपी धरणात ९३ टक्के म्हणजेच १७२६ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कश्यपी धरणग्रस्तांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महापालिकेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, जलसंपदा विभागाने त्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. या मागण्यांचा विचार न झाल्यास गंगापूर धरणात कश्यपीतून पाणी सोडू दिले जाणार नाही, तसा प्रयत्न केल्यास धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच काशीनाथ दत्तू मोंढे, सुकदेव सोनू मोंढे, सोमनाथ लक्ष्मण मोंढे, राजाराम भिका बेंडकोळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय