शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

कांदे नव्हे, बटाटे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:18 PM

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत ...

ठळक मुद्देभाजीपाला गडगडला : आठवडे बाजारात भाज्या मातीमोल

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत आहेत . सद्या केवळ बटाटे ५० रुपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे बटाट्याचे महत्त्व वाढले आहे. कांद्याच्या भावापेक्षा दुप्पट भाव बटाट्याला मिळत असल्यामुळे कांद्यापेक्षा बटाटे अनेक वर्षांनंतर महाग झाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता, तेव्हा शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सोयाबीन, मका आणि खरीप हंगामातील पिके काढल्यावर सर्वच शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली, जे शेतकरी कधीच भाजीपाला करत नव्हते. त्यांनीसुद्धा भाजीपाला लागवड केली, त्यामुळे पिकांचे क्षेत्र वाढले शिवाय कांदा रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतात काय लागवड करावी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड केली. भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ झाली. त्याचा फटका आज नगदी पिकाला बसत आहे.

पालेभाज्या कोणत्याही घेतल्यातरी अवघ्या पाच रुपये दरात इतकी स्वस्त जुडी मिळते, कोथिंबीर, शेपू, मेथी, पालक ५ रुपये जुडी तर वेलवर्गीय पालेभाज्या अवघ्या १० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहेत. बटाटे आणि लसूण मात्र चांगला भाव खात आहे. ही दोन्ही पिके सध्या दुसऱ्या राज्यातून येत आहे. येणारा सर्व बटाटा आणि लसूण दुसऱ्या भागातून येत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल बेभावात विक्री करावा लागत आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे आठवडे बाजारात किरकोळ विक्री केल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडे बाजारातदेखील भाजीपाला कवडीमोल भावात विक्री होत असल्यामुळे खर्चदेखील वसूल होत नाही.

- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती