शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

बनावट औषधे विक्री करणाऱ्यांना पोलिसांचे अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 7:46 PM

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र ब-याच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादकांची फसवणूक : फरफेक्ट कंपनीचा तपास गुंडाळला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करूनही त्याच्या मुळाशी जाणे टाळल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी व सूत्रधार तूर्त मोकळे फिरत आहेत.

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र बºयाच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांची काटेकोरपणे काळजी घेतली जात असल्याचे पाहूनच द्राक्षबागांसाठी लागणारी विविध प्रकारची औषधे पुरविणाºया कंपन्या उदयास आल्या असून, त्यात प्रामुख्याने मण्यांची फुगवणी व आकार वाढविण्यासाठी सीपीपीयू व पीजीआर ही औषधे गुणकारी ठरली आहेत. मात्र याच औषधांच्या नावाने बनावट औषधे तयार करून त्यांची खुलेआम विक्री करण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या भरारी पथकाने हाणून पाडला होता. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथे मे. परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या दुकानात व गुदामातून सुमारे चौदा लाख रुपये किमतीचा बनावट व विनापरवाना औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता. बनावट औषधांची विक्री करून शेतकºयांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या कामगिरीचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येऊन या प्रकरणी कृषी विभागाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक राजेंद्र मोदी याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणूक व कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन या कायद्यान्वये मोदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोदी याचा सहकारी भानुशाली नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत जुजबी विचारपूस करून गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी हात आखडता घेतला. परिणामी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते खुलेआम फिरत आहेत. परंतु शेतकºयांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला औषधांचा साठा आरोपींनी कोठून मिळविला, त्यांनी कोठे कोठे त्याची विक्री केली, औषधे तयार करण्यासाठी कच्चा माल कोठून आणला या साºया बाबी गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे कृषी खात्याने कारवाई करूनही निव्वळ पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे द्राक्ष उत्पादकांच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकलेला नाही.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकPoliceपोलिस