शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

 मुंबई -आग्रा महामार्गालगतच्या पर्यायी बाजारावर पोलिसांची कारवाई ; शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:57 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे  पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबे बहूला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरातील शेतकºयांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यावहारांना बाजाराचे स्वरुप येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी अखेर कारवाई करून शेतकरी व व्यापाऱ्यांना हुसकाऊन लावले.

ठळक मुद्देव्यापारी,शेतकऱ्यांच्या संगन्मताने पर्यायी बाजार गर्दी जमल्याने पोलिसांची पर्यायी बजारावर कारवाईअचानक कारवाईमुळे शेतकऱ्यांची धावपळ

नाशिक: रायगडनगर ते वाडीवऱ्हे दरम्यान मुंबई- आग्रा महामागालगत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगन्मताने चालणारा पर्यायी बाजार पोलिसांनी उधळून लावला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे  पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबे बहूला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरातील शेतकºयांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यावहारांना बाजाराचे स्वरुप येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी अखेर कारवाई करून शेतकरी व व्यापाऱ्यांना हुसकाऊन लावले. परंतु, अचानक झालेल्या या कारावई मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासग परिसरातील रानमाळात पळ काढाला लागाल्याचे दिसून आले. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आवाराताच व्यापाऱ्यांसह अन्य काही नागरिकांनाही कोरोनाची लागन झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर आणि गर्दीवर निर्बंध आले आहे. येथे नोंदणीकृत व्यापाऱ्यांव्यतिरिक्त अन्य खरेदीदारांना प्रवेश दिला जात नसल्याने इतर व्यापारी बाजारसमितीच्या आवाराबाहेर मिळेलल तेथे शेतमाल खरेदी करतात.  त्याचप्रमाणे एकाच वाहनातून अनेक शेतकरी माल घेऊन येतात. मात्र  बाजार समितीत वाहनचालक व एक शेतकख्यालाच प्रवेश मिळतो. त्यामुळे  शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी मिळून नाशिक शहरालगत मुंबई- आग्रा महामार्गवर रायगडनगर ते वाडिवऱ्हे दरम्यान अवजड वाहनांसाठी व स्वच्छतागृसाठी असलेल्या खुल्या जागेत छोटेखानी पर्यायी बाजार सुरू केला होता. परंतु, हळुहळू या ठिकाणी शेतकरी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्याने बुधवारी (दि.१०) अखेर पोलिसांनी कारवाई करीत या ठिकाणी जमलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांना हुसकावून लावले.

पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. तसेच याठिकाणी थांबलेली अनेक वाहने अचानक महामार्गावर आल्याने काही काळ याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल घेऊन अक्षर: परिसरातील माळरानावर पळ काढावा लागल्याचे चित्र दिसून आले. शेतमालाची विक्री कशी करावी नाशिक कृषी उत्तन्न बाजारसमितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारसमितीत काही प्रमाणात पालेभाज्या आवक घटली आहे. हे शेतकरी अशा पर्यायी ठिकाणांवर कृषी मालाची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शेतमालाची विक्री कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकPoliceपोलिसFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीvegetableभाज्या