शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमान्य टिळकांवर रचली कवी गोविंदांनी चार कवने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:58 IST

नाशिक : भारतीय असंतोषाचे जनक म्हणून गौरवल्या गेलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जननायकाच्या उत्तुंग कर्तृत्वाचे गुणगान करणारी चार कवने नाशिकचे तत्कालीन प्रख्यात कवी गोविंद दरेकर यांनी रचली होती. टिळकांच्या जीवनातील चार विभिन्न प्रसंगांवर त्यांनी रचलेली ही कवने त्यावेळच्या मेळ्यांमध्ये मोठ्या हिरीरीने गायलीदेखील गेली.

ठळक मुद्देआदरांजली : नाशिकमध्ये गणेशोत्सव आयोजनासाठी टिळकांनी घेतल्या होत्या बैठका

नाशिक : भारतीय असंतोषाचे जनक म्हणून गौरवल्या गेलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जननायकाच्या उत्तुंग कर्तृत्वाचे गुणगान करणारी चार कवने नाशिकचे तत्कालीन प्रख्यात कवी गोविंद दरेकर यांनी रचली होती. टिळकांच्या जीवनातील चार विभिन्न प्रसंगांवर त्यांनी रचलेली ही कवने त्यावेळच्या मेळ्यांमध्ये मोठ्या हिरीरीने गायलीदेखील गेली.कवी गोविंद आणि त्यांच्या मित्रांचा सन्मित्र समाज मेळा हा त्याकाळी नाशिकमध्ये प्रचंड गाजत होता. कवी गोविंद यांनी रचलेले ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे काव्य तर सर्व काव्यांचा कळसाध्याय ठरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवलग मित्र असलेले कवी गोविंद हे पायाने पूर्ण पांगळे पण स्वातंत्र्याचा विचार धगधगता ठेवणारे क्रांतिकारी कवी होते. त्यांचा सन्मित्र समाज मेळा १९०५ साली टिळकांनी आयोजित केलेल्या कवन स्पर्धेत विजेता ठरला होता. त्यावेळी झालेल्या टिळकांच्या दर्शनाने प्रेरित झालेल्या कवी गोविंद यांनी त्यांच्या जीवनावरील चार विविध प्रसंगांवर कवने रचून ती मेळ्यांमधून गायलीदेखील होती. त्यांनी सर्वप्रथम टिळकांवर ‘आर्यावर्ताचे अनभिषिक्त भूपती’ हे कवन सर्वप्रथम रचून त्यांच्या मेळ्यातून अनेकदा गायले. १९०८ साली टिळक यांना शिक्षा झाल्याने कळवळलेल्या कवी गोविंद यांनी ‘आमुचा वसंत कोणी नेला?’ हे दुसरे कवन रचले, तर टिळकांच्या एकसष्ठीनिमित्त ‘जय जय टिळका, अपार समर्था, वीराधी भास्करा शुभंकरा’ हे तिसरे कवन रचले, तर १ आॅगस्ट १९२० रोजी टिळकांनी देह ठेवल्यावर कवी गोविंदांनी त्यांच्या दहाव्या दिवशी ‘कोठे जाशी राष्टÑप्राणा, धर्मत्राणा, परदास्याच्या मरणा, गेला राष्टÑ तात तो गेला, गेला राष्टÑ जनक तो गेला, गेला राष्टÑ प्राण तो गेला’ हे काव्य रचून टिळकांना काव्यसुमनांजली अर्पित केली होती.टिळक होते नाशिकचे व्याहीलोकमान्य टिळकांचे ऋणानुबंध नाशिकशी जुळलेले होते. नाशिकच्या तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष विश्वनाथ केतकर यांचे सुपुत्र ग. वि. केतकर यांच्याशी टिळकांच्या कन्येचा विवाह झाला होता. त्यामुळे नाशिकचे व्याही झालेल्या टिळक यांचा सामाजिक कारणाबरोबरच कौटुंबिक कारणातूनही नाशिकशी स्नेह जुळलेला होता. नाशिकला गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी टिळकांच्या अनेकदा बैठका तसेच एक सभादेखील नाशिकला झाली होती.लोकमान्य टिळकांसारख्या महान जननायकाच्या केवळ दर्शनाने स्वातंत्र्यकवी गोविंद यांच्या प्रतिभेला बहर आला होता. त्यांच्या चार कवनांनी या सर्वश्रेष्ठ राष्टÑभक्ताला वाहिलेली काव्य सुमनांजली अजरामर ठरली आहे. - प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी, ज्येष्ठ अभ्यासक

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक