शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

जात्यावरील ओवींमुळेच कविता जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 10:50 PM

जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण पुरी यांनी केले.

ठळक मुद्देनारायण पुरी : रानवड महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ

पिंपळगाव बसवंत : जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण पुरी यांनी केले.रानवड येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य व्ही. एस. शिरसाठ, एस. पी. कदम, प्रा. ऐश्वर्य पाटेकर, रामभाऊ पानगव्हाणे, रामभाऊ आहेर, अशोक सोमवंशी, विलास वाघ, दीपक वाघ, महेश होळकर, मेघा रायते, गणेश आवारे आदी उपस्थित होते. आज राजकीय झेंडे घ्याल तर उद्या धोंडे हाती येतील, त्यामुळे युवकांनी फक्त तिरंगा झेंडाच हातात घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. महेश होळकर यांनी केला. प्रा. भाग्यश्री मोरे व ऐश्वर्या ताकटे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. आवारे यांनी आभार मानले.आईसाठी, मातृभूमीसाठी रक्त सांडता येते तोच खरा देशभक्तकवी पुरी यांनी ‘प्रेमाचा जंगडगुत्ता’ ही कविता सादर करताना त्यांनी बाहुबलीला कटपाने का मारले हा प्रश्न भारताला पडला होता; पण दाभोलकरांना का मारले? त्यांचे आरोपी कोण, हा प्रश्न भारताला नाही, फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना जरी पडला असता तरी आज त्यांचे मारेकरी कारागृहात असते, असे परखड मत मांडले. ज्याला आईसाठी व मातृभूमीसाठी रक्त सांडता येते तोच खरा देशभक्त असतो. कोणीही रंगावर जाऊ नये. जे ढग काळे असतात त्यातच पाणी असते. काळा रंग निर्मितीचे प्रतीक आहे. कवीने सामान्य माणसांच्या वेदना मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे. समाजात साप, सरडे निर्माण होऊ नये हाच साहित्यिकांचा उद्देश असतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक