शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

By suyog.joshi | Updated: October 24, 2023 16:50 IST

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नाशिक -  ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा क्षण ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील हजारो बुद्ध उपासक तसेच देश-विदेशातील भिख्खू उपस्थित होते. विजयादशमी अर्थात मंगळवार, दि. २४ रोजी पांडवलेणीजवळ त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते या ऐतिहासिक महाबोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्रीलंकेचे सांस्कृतिक मंत्री विदूर विक्रम नायक, श्रीलंकेतील भिक्खू नाराणपणावे, भिक्खू पोंचाय, भदंत खेमधम्मो महस्थवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्य शासनाने १८ कोटींचा तातडीने निधी देत या कामात सिंहाचा वाटा उचलला. हा बोधीवृक्ष श्रीलंकेतून आणला असून ही एक प्रकारे महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. ज्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, त्याच झाडाचे नाशिकमध्ये रोपण होत आहे, ही कौतुकाची बाब आहे. विदूर विक्रम नायक म्हणाले, या देशात फक्त एकच भाषा आहे, ती आहे हद्याच. प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमानेच वागले पाहिजे. एकमेकातील कटूता दूर व्हायला हवी. ऐतिहासिक बोधी वृक्ष म्हणजे हा मानवतेचा संदेश देणाो असून बुद्धांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे, त्याचे प्रत्येकाने अवलोकन करणे गरजेचे आहे.मंत्रोच्चारात कार्यक्रमबौद्ध भिखू महासंघाच्यावतीने बुद्ध उपासना व मंत्रोच्चारात महाबोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित भिखूंनी या झाडाला माती अर्पण केली. त्यानंतर इतर मान्यवरांनी झाडाला पाणी घातले. कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण, ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संदेशकार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे उपासकांना संदेश दिला. भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यत पाेहोचविण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे समता, बंधुता, शांतता पाळणारी, मुल्ये जाेपासणारे राज्य आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी शांतीची उजळणी करण्याचा सल्ला शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Nashikनाशिक