शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

By suyog.joshi | Updated: October 24, 2023 16:50 IST

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नाशिक -  ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा क्षण ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील हजारो बुद्ध उपासक तसेच देश-विदेशातील भिख्खू उपस्थित होते. विजयादशमी अर्थात मंगळवार, दि. २४ रोजी पांडवलेणीजवळ त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते या ऐतिहासिक महाबोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्रीलंकेचे सांस्कृतिक मंत्री विदूर विक्रम नायक, श्रीलंकेतील भिक्खू नाराणपणावे, भिक्खू पोंचाय, भदंत खेमधम्मो महस्थवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्य शासनाने १८ कोटींचा तातडीने निधी देत या कामात सिंहाचा वाटा उचलला. हा बोधीवृक्ष श्रीलंकेतून आणला असून ही एक प्रकारे महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. ज्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, त्याच झाडाचे नाशिकमध्ये रोपण होत आहे, ही कौतुकाची बाब आहे. विदूर विक्रम नायक म्हणाले, या देशात फक्त एकच भाषा आहे, ती आहे हद्याच. प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमानेच वागले पाहिजे. एकमेकातील कटूता दूर व्हायला हवी. ऐतिहासिक बोधी वृक्ष म्हणजे हा मानवतेचा संदेश देणाो असून बुद्धांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे, त्याचे प्रत्येकाने अवलोकन करणे गरजेचे आहे.मंत्रोच्चारात कार्यक्रमबौद्ध भिखू महासंघाच्यावतीने बुद्ध उपासना व मंत्रोच्चारात महाबोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित भिखूंनी या झाडाला माती अर्पण केली. त्यानंतर इतर मान्यवरांनी झाडाला पाणी घातले. कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण, ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संदेशकार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे उपासकांना संदेश दिला. भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यत पाेहोचविण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे समता, बंधुता, शांतता पाळणारी, मुल्ये जाेपासणारे राज्य आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी शांतीची उजळणी करण्याचा सल्ला शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Nashikनाशिक