शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपळगावची दुसऱ्यांदा बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 01:58 IST

माझी वसुंधरा अभियान टप्पा-२अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून आपले कर्तव्य पार पडावे तसेच महाराष्ट्र राज्य हरित करण्यासाठी हा कार्यक्रम व्यापक करावा. त्यासाठी आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

पिंपळगाव बसवंत : माझी वसुंधरा अभियान टप्पा-२अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून आपले कर्तव्य पार पडावे तसेच महाराष्ट्र राज्य हरित करण्यासाठी हा कार्यक्रम व्यापक करावा. त्यासाठी आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

पर्यावरणदिनानिमित्त रविवारी (दि. ५) मुंबई येथील नरिमन पाॅईंटजवळील टाटा थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, राजशिष्टाचार व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अलका बनकर, उपसरपंच बापू कडाळे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे आणि ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत पिंपळगाव ग्रामपालिकेने यापूर्वीही सहभाग नोंदवित राज्यात प्रथम पुरस्कारासह दीड कोटींचे पारितोषिक पटकावले होते. स्पर्धेत पिंपळगाव ग्रामपालिकेने दुसऱ्यांदा सहभाग नोंदवित शहरात अभिनव उपक्रम राबविले. या उपक्रमाची दखल घेऊन राज्यातील ग्रामपंचायत गटातून पिंपळगाव ग्रामपालिकेची निवड करण्यात आली.

पिंपळगाव ग्रामपालिकेने या अभियानात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. यात निसर्ग वाचवा, गुलाबी गाव संकल्पना, पुस्तकाचे गाव, चिमण्यांची भिंत, कबुतर खाना, पाणी बचत, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, उद्याने, व्यायामशाळा, वार्ड सुशोभीकरण, स्मार्ट स्मशानभूमी, ओझोन पार्क, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण तसेच लहान मुलांसाठी बगिचा, नाना-नानी पार्क आदी उपक्रमांचा समावेश होता. पिंपळगाव ग्रामपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज पाच लाख लिटर पाणी वाया जात होते. नवीन जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणी शुद्ध करून वापरात आणले गेले. तसेच ४० वर्षांपासून साचलेल्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले. पर्यावरणाचा समतोल साधून घनकचरा व्यवस्थापन, गावाची स्वच्छता याअंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वाचे संरक्षण व संवर्धन केले. त्यामुळे या नावीन्यपूर्ण उपक्रमातून पिंपळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडली.

कोट.....

शासनाच्या सर्वनियमांचे पालन करीत नागरिकांच्या पुढाकारातून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि लोकप्रतिनिधीच्या सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी झाले. त्यामुळे ग्रामपालिकेला दुसऱ्यांदा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून, पिंपळगाव शहराच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

- अलका बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार