शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपळगावची दुसऱ्यांदा बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 01:58 IST

माझी वसुंधरा अभियान टप्पा-२अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून आपले कर्तव्य पार पडावे तसेच महाराष्ट्र राज्य हरित करण्यासाठी हा कार्यक्रम व्यापक करावा. त्यासाठी आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

पिंपळगाव बसवंत : माझी वसुंधरा अभियान टप्पा-२अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून आपले कर्तव्य पार पडावे तसेच महाराष्ट्र राज्य हरित करण्यासाठी हा कार्यक्रम व्यापक करावा. त्यासाठी आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

पर्यावरणदिनानिमित्त रविवारी (दि. ५) मुंबई येथील नरिमन पाॅईंटजवळील टाटा थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, राजशिष्टाचार व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अलका बनकर, उपसरपंच बापू कडाळे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे आणि ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत पिंपळगाव ग्रामपालिकेने यापूर्वीही सहभाग नोंदवित राज्यात प्रथम पुरस्कारासह दीड कोटींचे पारितोषिक पटकावले होते. स्पर्धेत पिंपळगाव ग्रामपालिकेने दुसऱ्यांदा सहभाग नोंदवित शहरात अभिनव उपक्रम राबविले. या उपक्रमाची दखल घेऊन राज्यातील ग्रामपंचायत गटातून पिंपळगाव ग्रामपालिकेची निवड करण्यात आली.

पिंपळगाव ग्रामपालिकेने या अभियानात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. यात निसर्ग वाचवा, गुलाबी गाव संकल्पना, पुस्तकाचे गाव, चिमण्यांची भिंत, कबुतर खाना, पाणी बचत, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, उद्याने, व्यायामशाळा, वार्ड सुशोभीकरण, स्मार्ट स्मशानभूमी, ओझोन पार्क, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण तसेच लहान मुलांसाठी बगिचा, नाना-नानी पार्क आदी उपक्रमांचा समावेश होता. पिंपळगाव ग्रामपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज पाच लाख लिटर पाणी वाया जात होते. नवीन जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणी शुद्ध करून वापरात आणले गेले. तसेच ४० वर्षांपासून साचलेल्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले. पर्यावरणाचा समतोल साधून घनकचरा व्यवस्थापन, गावाची स्वच्छता याअंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वाचे संरक्षण व संवर्धन केले. त्यामुळे या नावीन्यपूर्ण उपक्रमातून पिंपळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडली.

कोट.....

शासनाच्या सर्वनियमांचे पालन करीत नागरिकांच्या पुढाकारातून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि लोकप्रतिनिधीच्या सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी झाले. त्यामुळे ग्रामपालिकेला दुसऱ्यांदा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून, पिंपळगाव शहराच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

- अलका बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार