शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर लोकप्रतिनिधींचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 02:13 IST

जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला. अधिकाºयांची दिरंगाई, कामाची चुकीची पद्धत आणि ठेकेदाराच्या प्रभावातून काम रखडवले जात असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. राजकीय द्वेषातून कामे रोखण्याच्या अनैतिक प्रकाराला अधिकारीही बळी पडत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्रीही नाराज : अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा; राजकीय प्रभावातून कामे रोखण्याचा आरोप

नाशिक : जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला. अधिकाºयांची दिरंगाई, कामाची चुकीची पद्धत आणि ठेकेदाराच्या प्रभावातून काम रखडवले जात असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. राजकीय द्वेषातून कामे रोखण्याच्या अनैतिक प्रकाराला अधिकारीही बळी पडत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. रखडलेल्या कामांची माहिती, परत गेलेला निधी आणि निधी मंजुरीच्या फाईल्स का अडविल्या जातात, याचा खुलासा यावेळी अधिकाºयांनाही करता आला नाही. यावर पालकमंत्र्यांनी हा गंभीर प्रकार असल्याचे अधोरेखित करीत पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या समस्यांचे वैयक्तिक निराकरण करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.आमदार पंकज भुजबळ यांनी मतदारसंघातील मक्यावरील लष्कर अळीच्या प्रभावामुळे नुकसान झाल्याने नुकसानभरपाईची मागणी केली, तर जिल्ह्णातील पाऊस मोजताना ज्या तालुक्यांमध्ये पाऊस झालेलाच नाही अशा तालुक्यांनाही त्यात मोजले जात असल्याने दुष्काळी नियोजनात अशा तालुक्यांवर अन्याय होतो याकडे लक्ष वेधले. ग्रामीण रुग्णालये सक्षम केली तर जिल्हा रुग्णालयांवर ताण येणार नाही, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आमदार निर्मला गावित यांनीदेखील इगतपुरीतील रुग्णालयाला सक्षम करण्याची मागणी केली तसेच ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची उपयुक्तताही सांगितली. भावली धरणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याकडे लक्ष वेधतानाच इगतपुरीतील पावसाचे प्रमाण लक्षात घेता येथील धरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी शाळा खोल्यांच्या दुरवस्था आणि शाळा बांधकामाचा मुद्दा मांडला.आमदार किशोर दराडे यांनी शाळा खोल्यांसाठी निधीची मागणी केली. जिल्ह्णातील ५९ शाळांनी वीजबिल न भरल्याने त्यांची वीज बंद करण्यात आल्याकडेही लक्ष वेधले. या शाळा अंधारात असून, डिजिटल शाळांना जोडणी आहे, परंतु वीज बिलाचा प्रश्न असल्याने शाळांच्या वीज बिलासाठी स्वतंत्र हेडची मागणी नोंदविली.आमदार दीपिका चव्हाण यांनी मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी या नद्या शासनाने अधिसुचित केल्या आहेत. या नद्यांवर केटीवेअर बांधण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळत नसल्याचे सांगितले. या नद्यांवर एचडीपीई ५०० मायक्रॉनचा प्लॅस्टिक पेपर वापरून भूमिगत बंधाºयासाठी मान्यता देण्याची मागणी केली. सिमांतिनी कोकाटे, आत्माराम कुंभार्डे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांसाठी निधीची मागणी केली. खासदार भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार देवयानी फरांदे, योगेश घोलप, राजाभाऊ वाजे यांनीही अनेक मुद्दे उपस्थित केले.नांदगाव, मनमाडला कृत्रिम पावसाची मागणीजिल्ह्णातील धरणक्षेत्रात आणि शहरी भागात पाऊस होत असला तरी जिल्ह्णातील अजूनही सहा तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर नांदगाव, मनमाड या ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी पंकज भुजबळ यांनी केली. मागीलवर्षी असाच प्रयोग करण्यात आला होता, तो यशस्वी होऊ शकला नसला तरी यंदा कृत्रिम पावसाची आवश्यकता निर्माण झाल्याचे सांगितले. आमदार दीपिका चव्हाण यांनीदेखील देवळा, कळवण तालुक्यांमध्ये कृत्रिम पावसाची आवश्यकता व्यक्त केली...तर अधिकाºयांवर कारवाईकेंद्र आणि राज्य शासन विकासाच्या अनेक योजना जनतेसाठी लागू करीत असताना अधिकाºयांकडून अशाप्रकारे दिरंगाई होणार असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. शासन गतिमान असताना प्रशासनानेदेखील गतिमान होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी काम करीत नसतील आणि जनतेला योजनांना लाभ होणार नसेल तर याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही महाजन म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजन