शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या उड्या

By admin | Updated: May 25, 2017 18:52 IST

नाशिक वनविभाग पुर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत नाशिक, दि. 25 - येवला तालुक्यातील नाशिक वनविभाग पुर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर असलेल्या या राखीव वनक्षेत्रात काळवीटच्या उड्या वाढल्याने शुभ वर्तमान मानले जात आहे. ममदापूर संवर्धन राखीव जंगलात हरणाच्या काळवीट प्रजातीची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात झालेल्या प्रगणनेअंतर्गत सुमारे एक हजार ४२ काळवीट आढळून आले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्क्यांनी काळविटांच्या संख्येत वाढ झाल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले.

नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण, रेंदळे या गावांच्या परिसरात विस्तारलेले जंगल काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काळविटांची संख्या वाढण्यासाठी त्यांना पोषक असे वातावरण व योग्य त्या सोयी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण संवर्धन क्षेत्रात ठिकठिकाणी वनविभागाच्या वतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे.

 

तसेच सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्याने पाण्याची मोठी समस्या मार्गी लागली आहे. यामुळे काळविटांचे जंगलातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्याची सोय व गवतासह अन्य प्रकारच्या झाडाझुडपांची लपण संवर्धन क्षेत्रात वाढविण्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भर दिल्यामुळे काळविटांचा संवर्धन क्षेत्रात मुक्काम वाढीस लागला आहे. या वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या परिसरात लांडगा, मोर, तरस, रानडुक्कर यांचेही संवर्धन होत आहे. काळविटांची भटकंती थांबल्याने सुरक्षा बळकट झाली आहे.

 

वन्यजिवांची आकडेवारी अशी...कक्ष क्र =        काळवीट (नर) - काळवीट (मादी) - बछडे -  मोर  - लांडगा -   खोकड -  तरस -  रानडुक्करममदापूर -          ५७                 ९५                      १        -           -               १          -             -ममदापूर -           १०                  ३०                     ५ -                  २             २          १             ७                   रेंदळे -                 ७५                 १८६                     -       ३२        २             ७         -              -                                                                                            राजापूर -             ३२                  ६४                     १५      १८        ४               -          -             - पिंपळकुटे -          २३                 १०३                    १४      २०       २               -         -             १२राजापूर (५३५) -   ११                  ०४२                    ४       १५        ४               -         -              -सोमठाण -            १६                  ०५७                   ८        ६          ४              -        ०२            -देवदरी/खरवंडी -    १७                  ०२८                   -         १४         २             -         ०१          ०३रहाडी-                 ५६                   ७०                   ११          -          -             -           -            -एकूण -                २९७                ६७५                  ७०      १०८        २०         १०         ०४        २२

मेंढपाळांच्या चराईचे आव्हानराखीव वनक्षेत्राच्या परिसरात पावसाळ्यापासून पुढे चार ते सहा महिन्यांपर्यंत मेंढपाळांच्या चराईचे मोठे आव्हान वनविभागापुढे आहे. वनक्षेत्राच्या परिसरात मेंढपाळांकडून घुसखोरी करून मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या जात असल्यामुळे गवताची विल्हेवाट लागते. मेंढ्यांच्या खुऱ्यांमुळे गवत खुरडले जाते तसेच मेंढ्या मुळापासून गवत खात असल्यामुळे गवताची वाढ होत नाही आणि गवत पावसाळ्यानंतर चार महिन्यांतच नष्ट होण्यास सुरूवात होते. यामुळे यंदा वनखात्याला संवर्धन क्षेत्राच्या संरक्षणाच्या दृष्टिने तटबंदी अधिक बळकट करावी लागणार आहे.

 

पाच महिन्यांत दोन हल्ले, एक अपघातममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये पाणवठे व सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्यामुळे काळविटांचा जंगलात मुक्काम वाढला आहे. यामुळे दुर्घटनांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करताना कुत्र्यांच्या हल्ल्यात किंवा वाहनांच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी अथवा जखमी होण्याच्या घटना घडत होत्या. या पाच महिन्यांत कुत्र्यांनी काळविटांवर दोनदा हल्ले केले तर एकदा अपघातात काळवीट जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी अपघात व कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या सुमारे दहा ते पंधरा घटना घडल्या होत्या.