शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सामाजिक सहजीवनाची हाक देणारी पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:16 IST

वारकरी मंडळाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अभ्यास दौरा करीत असताना दरवर्षी माउलींची दिंडी, संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा, संत मुक्ताबाई दिंडी सोहळा, पैठणचे संत एकनाथ महाराज दिंडी सोहळा या सर्व दिंड्या जवळून अनुभवल्या आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या खास धार्मिक वैशिष्ट्यात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार महत्त्व

वारकरी मंडळाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अभ्यास दौरा करीत असताना दरवर्षी माउलींची दिंडी, संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा, संत मुक्ताबाई दिंडी सोहळा, पैठणचे संत एकनाथ महाराज दिंडी सोहळा या सर्व दिंड्या जवळून अनुभवल्या आहेत. महाराष्ट्राच्या खास धार्मिक वैशिष्ट्यात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार महत्त्व आहे. एक आहे शयनी एकादशी तर दुसरी आहे प्रबोधिनी एकादशी होय. नववधूला ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाला माहेरचा ओढा असतो त्याप्रमाणे वारकरी भाविक यांना पंढरीची ओढ असते, ‘पंढरीये माझे माहेर साजणी!’ आणि ‘माझे माहेर पंढरी! आहे भिवरेच्या तीरी!!’ तसेच ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता! पंढरीची वारी आहे माझे घरी!’ नववधूला ज्याप्रमाणे सासरी आपले माहेरच्या आई-वडील भाऊ, बहिणीची आठवण होते त्याचप्रमाणे वारकरी भाविकांना आपल्या इष्टदेवतेची म्हणजेच पांडुरंगाची आठवण होते व मी केव्हा पंढरीला जाईल, अशी तळमळ वाटते. पंढरी त्यांचे माहेर, पांडुरंग त्यांचा पिता, चंद्रभागा त्यांची बहीण, पुंडलिक त्यांचा भाऊ यांना कधी भेटेन, अशी मनात प्रेमाची सदिच्छा असते. सासरी बंधने माहेरी मुक्तता. सासरी दु:ख तर माहेरी सुख असते. सासरी काम असते तर माहेरी आराम असतो. वारी हा नुसता प्रवास नसून दैनंदिन जीवनात केलेला बदल आहे, तेच ते विचार, आचार, व्यापार करण्यापेक्षा वेगळी व आनंददायी यात्रा म्हणजे वारी होय. आनंदाने आनंदासाठीच चालायचे, इतरांचे विचार व अनुभव समजून घेणे, सुख-दु:खाची देवाण-घेवाण करणे, शारीरिक व्यायाम, नवदृष्टी, नवीन मित्रमंडळी, अनेक विषयांचे चर्चासत्र म्हणजे वारी. प्रेमाची मात, देवाची साथ, सेवेचा हात म्हणजे वारी होय. वारी ही शरीरासाठी दवा, मनासाठी दावा, बुद्धीसाठी दुवा हीच वारीची हवा. या वारीत आपला अहंकार गळून पडतो. मोठेपणा, पदप्रतिष्ठा विसरणे म्हणजे वारी होय. प्रतिष्ठित, धनवान, जगमान्य लोक हे लोकमान्य होतात, देवमान्य होतात व आपलं मोठेपण विसरून गळ्यात टाळ घेऊन हरिनामात दंग होतात, हे वारीचं वैभव व मोठेपण आहे. सामाजिक सहजीवनाची हाक निर्माण होणं वारी आहे. कपाळी गंध, मनाला नामाचा छंद, हृदयामध्ये गोविंद ही वारीची अंतरंग साधना आहे व गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये टाळ एकादशीला करतो फराळ, जो प्रपंच विसरतो, तो खरा वारकरी होय. एकनिष्ठ असणे हेच त्यांचे ज्ञान आहे.सगुण उपासना ही वारकरी भाविकांचा आत्मा आहे, ज्ञानेश्वरी व गाथा या व्यतिरिक्त कोणत्याही ग्रंथाला महत्त्व न देणं ही निष्ठा, सतत नामचिंतन करणे, जे भक्ती, प्रेम या तत्त्वाला मानतात त्यांचीच संगत करणे, सर्व भार देवांवर टाकून निश्चिंत राहणं, घडेल तेवढी संतसेवा करणे, आत्मनिर्भर राहणे, देवासाठी शरीर झिजवणे, ‘देह समर्पिजे देवा! भार काहीच न घ्यावा! होईल आघवा! तुका म्हणे आनंद!!’ दिंडी वारीमध्ये कोणतेही भजन म्हणत नाही, नियमाचे भजन होते. वारी भक्तीप्रेमाचा आविष्कार आहे. नाहीतरी घराला घरपण व माणसाला मोठेपण ज्ञानापेक्षा प्रेमाने येते ते प्रेम देवाचे देणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘प्रेम देवाचे हे देणे! देह भाव जाय जेणे!!’ बाहेर देव दिसत नाही, असे आधुनिक चिंतकाचे मत असले तरी ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’ तसेच ‘तुका म्हणे लक्ष ठेवोनी अंतरी! तोची वारकरी पंढरीचा!!’ श्वासावर लक्ष ठेवून नामसाधना अशी आध्यात्मिक वारी घडावी हाच वारीचा खरा उद्देश आहे. वारी म्हणजे येरझार, येणे आणि जाणे संपणे. माउली म्हणतात, ‘याची एकेपरी! पकाचिये कुसरी! सारीतसे वारी संसाराची!!’ जन्ममरणाची येरझार संपणे म्हणजे वारी, विकार संपणे म्हणजे वारी होय. तेथ सरली वारी क्र ोधाचिये!! त्याकरिता पंढरीची मुख्य वारी दोन प्रकारात एक आषाढी व दुसरी कार्तिकी, खुद्द भगवंताचे मनोगत संत नामदेव महाराज एका अभंगात सांगतात, ‘आषाढी कार्तिकी विसरु नका मज! सांगतसे गुज पांडुरंग!!’ उपरोक्त नियमावली ही वारकरी साधना आहे आणि या प्रकारे पंढरीची वारी जे करतात ते मोक्षाचे अधिकारी आहेत, असे तुकाराम महाराज म्हणतात. ‘पंढरीचे वारकरी! ते अधिकारी मोक्षाचे!!’(लेखक अ.भा. वारकरी मंडळ,नाशिक जिल्हाध्यक्ष आहेत.)