शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वीजबिले कमी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 6:09 PM

न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली.उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिले रद्द करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देवीज वितरणकडून दखल माणिकपुंज परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान

नांदगाव : न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी येथील वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांना याविषयी जाब विचारला.सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिले रद्द करण्याचे आदेश दिले.

आधी कवडे यांना तुमचे बिल आम्ही कमी केले आहे ना? अशी मखलाशी करून शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कवडे यांनी माणिकपुंज धरणातून शेतीसाठी पाणी उचलणाºया सर्व शेतकºयांचे सदर कालावधीतील बिल का आकारू नये याविषयी वस्तुस्थिती मांडली. लोकमतमध्ये छापून आलेल्या वृत्ताचा संदर्भ दिला. तेव्हा साळुंके यांनी जे शेतकरी आमच्याकडे येतील त्यांची बिले कमी करून देऊ असे सांगितले; परंतु तुमची चूक आहे. तुमच्या पातळीवर सर्वांचीच बिले कमी करण्यात यावी, असे त्यांना स्पष्ट केले.जुलै ते नोव्हें. २०१७ या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; मात्र खंडित कालावधीची बिले अदा करण्यात आली. बिलात १० अश्वशक्तीच्या पंपासाठी १२ हजार रु . चार्ज करण्यात आले होते. असे सुमारे २०० ते ३०० पंप आहेत. याचा गौप्यस्फोट लोकमतने केला. यंदा सरासरीपेक्षा २५ टक्केच पाऊस झाला आहे. परतीच्या पावसानेही दगा दिला आहे. त्यामुळे माणिकपुंज धरणातील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे, अशी जनतेची मागणी आहे. तथापि कागदोपत्री अद्याप तसे करण्यात आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने वीज वितरण कंपनी व जलसंपदा विभाग यांना डोळ्यात तेल घालून पाणी अनाधिकाराने उचलण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये असे आदेश काढावेत, अशी मागणी कवडे यांनी केली आहे. तसेच शहरात तीन दिवसांपासून विजेचे भारनियमन सुरू असून, शहरात दोन भागात वेगवेगळ्या निकषाने आठ तासांपेक्षाही अधिक वेळ भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

टॅग्स :electricityवीजbillबिल