शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विरोधक एकत्र : निवडणुकीच्या तोंडावर जनतेची नाराजी मनपाच्या करवाढीने सत्ताधारी भाजपात अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:10 IST

नाशिक : देश व राज्यपातळीवरील सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच घटकांत असंतोष व नाराजीचे वातावरण असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी पिवळ्या पट्ट्यातील इंचन् इंच जमिनीवर २० टक्के कर आकारणीचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या रोषात आणखीच भर पडली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व नगरसेवकांमध्ये अस्वस्थता व्यक्त त्यातून कसा मार्ग काढायचा याचा खल सुरू

नाशिक : देश व राज्यपातळीवरील सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच घटकांत असंतोष व नाराजीचे वातावरण असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी पिवळ्या पट्ट्यातील इंचन् इंच जमिनीवर २० टक्के कर आकारणीचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या रोषात आणखीच भर पडली असून, वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवकांमध्ये अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. भाजपाने कर वाढीच्या प्रश्नावर विशेष महासभा बोलाविली असली तरी, विरोधी पक्षांकडून भाजपालाच टार्गेट केले जाणार असल्याने त्यातून कसा मार्ग काढायचा याचा खल सुरू झाला आहे. नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या हातात सत्ता दिल्यास नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. नाशिककरांनी फडणवीस यांच्यावर विश्वास दर्शवित भारतीय जनता पक्षाला नाशिक महापालिकेत स्पष्ट बहुमत देऊन सत्ता ताब्यात दिली. परंतु वर्षे उलटूनही महापालिका प्रशासन वा सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांना दिलासा देणारा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. बांधकाम व्यावसायिकांचा कपाटाचा प्रश्न अद्यापही कायम असून, तो न सुटल्याने नवीन बांधकामे सुरू करण्यास व्यावसायिक धजावत नाहीत, त्याचा परिणाम बेरोजगार वाढीत तसेच शहराच्या विकास कुंठीत होण्यात झाला आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केल्यामुळे तर त्यांच्या शिस्तपर्वाचा फटका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांइतकाच नाशिककरांनाही बसू लागला असून, त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीचा विचार करता सत्ताधारी भाजपा पूर्णत: दुर्बळ ठरली आहे. परिणामी मुंढे यांनी अलीकडेच केलेल्या करवाढीमुळे तर संपूर्ण नाशिककरांची नाराजीच भाजपावर ओढवली आहे. या करवाढीचे समर्थन करणे नगरसेवकांनाही अवघड झाले असून, अशातच विरोधी पक्षांनी या मुद्द्याचा आधार घेत भाजपाला करवाढीच्या प्रश्नावरून नाशिककरांमध्ये महापालिकेच्या कारभाºयांविषयी संताप व नाराजी व्यक्त केली जात असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही लोकप्रतिनिधी व प्रदेश पदाधिकाºयांमध्ये महापालिका आयुक्तांच्या निर्णयाबाबत मतभेद उघड झाले आहेत. काही लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या विरोधात थेट शेतकरी मेळाव्यात सहभागी होऊन जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले आहे, तर काही लोकप्रतिनिधी व प्रदेशच्या पदाधिकाºयांनी आयुक्तांची भूमिका योग्य ठरविली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाकडून केल्या जाणाºया प्रचाराला तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न विचारला जात आहे.