शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्णांसाठी मंगळवारपासून प्रवेशाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 6:12 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देपुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातही दोन वर्षांपासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, यावर्षी प्रवेशप्रक्रियेतील तीन नियमित आणि एक विशेष फेरी झाल्यानंतर ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ अशा एकूण पाच फेºयांमध्ये जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.३०) जाहीर झाला असून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे  पुन्हा एकदा प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी राबविली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, दि. ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका घेऊन प्रवेश अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतरच दि. ९ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.

सात हजार जागा उपलब्धशहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अजूनही सहा ते सात हजार जागा उपलब्ध असून, त्या जागांवर पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा घसरल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी होती. त्यामुळे पुरवणी परीक्षेसाठी २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यातील सहा हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना अकरावीसाठी प्रवेशाची अंतिम संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अशी होईल प्रवेशफेरी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि. ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान माहिती पुस्तिका घेऊन त्यानुसार प्रवेश अर्ज करता येणार असून, दि. ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयांना राखीव कोट्याच्या रिक्त जागा समर्पित करावी लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध रिक्त जागांवर दि. ९ सप्टेंबरपासून ६० टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, तर १३ सप्टेंबरपासून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार असून, दि. १३ ते १४ सप्टेंबरदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. १६ सप्टेंबरला एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना कॉलेज निवडण्याची संधी दिली जाणार असून, दि. १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी