शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:57 IST

त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.

ठळक मुद्देदोन महिने संपले पण अद्याप पाउस ४५९ मि.मि. वरच !

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर समजला जातो. पण या वर्षी त्र्यंबकवर पाउस कोपला आहे. एरवी त्र्यंबक शहरासह तालुक्यात दोन महिन्यात १२०० ते १५०० मि. मी. पाउस पडतो आणि लोकांच्या पेरण्या पुर्ण होतात.श्रावणात शेतीची कामे पुर्ण होउन भाद्रपदात निंदणीची कामे पुर्ण होतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर जवळ महिरावणी येथे नाशिक जिल्ह्याच्या पुर्वभागात सारखा पाऊस पत असून लागवड झालेली पिके पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. पण त्र्यंबक परिसरात पावसाचा थेंब नाही. काळे ढग आकाशात गर्दी करतात. जोराचा पाऊस येईल. पण अचानक वारा सुटतो आणि जमलेले ढग वाºयाच्या झोतात विखुरले जातात. असा सद्या खेळ सध्या सुरु आहे.३१ जुलैपर्यंत मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता सन २०१५-३०१ मि.मि., २०१६-८८६ मि.मि., २०१७-१५१० मि.मि., २०१८-१०७८ मि.मि., २०१९-१२७४ मि.मि., तर यावर्षी अवघा ४५९ मि.मि. पाउस पडला आहे. त्यामुळे यावर्षी त्र्यंबकेश्वरला पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तालुक्यात खरीपाचे २४४०० हेक्टर क्षेत्र असुनही भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद आदींची पेरणी पुर्ण होउ शकलेली नाही.या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. अर्थात ज्यांच्या शेतात विहीरीचे पाणी उपलब्ध आहे. असे लोक भाताला पाणी भरु शकतात. पण ज्यांच्याकडे विहीरच नाही असे लोक काहीच करु शकत नाहीत. आपल्या डोळ्यासमोर भाताचे पिक नष्ट होतांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. आज अनेक शेतकऱ्यांची पिके पिवळे पडत चालले आहेत. आता दुबार पेरणीसाठी देखील बळीराजाची आर्थिक कुवत राहीली नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस