शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:57 IST

त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.

ठळक मुद्देदोन महिने संपले पण अद्याप पाउस ४५९ मि.मि. वरच !

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर समजला जातो. पण या वर्षी त्र्यंबकवर पाउस कोपला आहे. एरवी त्र्यंबक शहरासह तालुक्यात दोन महिन्यात १२०० ते १५०० मि. मी. पाउस पडतो आणि लोकांच्या पेरण्या पुर्ण होतात.श्रावणात शेतीची कामे पुर्ण होउन भाद्रपदात निंदणीची कामे पुर्ण होतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर जवळ महिरावणी येथे नाशिक जिल्ह्याच्या पुर्वभागात सारखा पाऊस पत असून लागवड झालेली पिके पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. पण त्र्यंबक परिसरात पावसाचा थेंब नाही. काळे ढग आकाशात गर्दी करतात. जोराचा पाऊस येईल. पण अचानक वारा सुटतो आणि जमलेले ढग वाºयाच्या झोतात विखुरले जातात. असा सद्या खेळ सध्या सुरु आहे.३१ जुलैपर्यंत मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता सन २०१५-३०१ मि.मि., २०१६-८८६ मि.मि., २०१७-१५१० मि.मि., २०१८-१०७८ मि.मि., २०१९-१२७४ मि.मि., तर यावर्षी अवघा ४५९ मि.मि. पाउस पडला आहे. त्यामुळे यावर्षी त्र्यंबकेश्वरला पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तालुक्यात खरीपाचे २४४०० हेक्टर क्षेत्र असुनही भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद आदींची पेरणी पुर्ण होउ शकलेली नाही.या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. अर्थात ज्यांच्या शेतात विहीरीचे पाणी उपलब्ध आहे. असे लोक भाताला पाणी भरु शकतात. पण ज्यांच्याकडे विहीरच नाही असे लोक काहीच करु शकत नाहीत. आपल्या डोळ्यासमोर भाताचे पिक नष्ट होतांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. आज अनेक शेतकऱ्यांची पिके पिवळे पडत चालले आहेत. आता दुबार पेरणीसाठी देखील बळीराजाची आर्थिक कुवत राहीली नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस