शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सटाण्यात कांदा गडगडला ;संतप्त शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 6:57 PM

 कांद्याला भाव नसल्यामुळे बागलाण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला आहे. गुरु वारी कांद्याला शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. यावेळी संचालक मंडळ व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने अखेर संतप्त शेतकºयांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन सटाणा मालेगाव रस्ता दीड तास रोखून धरला.

यावेळी एका शेतकºयाने ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुक्यात येत असताना त्या दिवशी त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. तालुक्यात कांदा आंदोलन पेटले असून शेतकºयांची समजूत घालताना प्रशासनाच्या नाकीनऊ येताना दिसत आहे. आगामी काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. बागलाण तालुक्यात पावसाळी रांगडी व उन्हाळी अशा तिन्ही प्रकारच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.त्यापैकी उन्हाळी कांद्याची चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते.या वर्षी जवळपास संपूर्ण वर्षभर कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने कांदा चाळीतच खराब झाला आहे.दुसरीकडे शेतातील नवीन मालालाही बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.अशातच गुरु वारी (दि.२४) येथील बाजार समतिीत कांदा लिलाव सुरू होताच येथील मुंजवाड येथील गोकुळ पवार या शेतकºयाच्या नवीन कांद्यास शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला.इतर शेतकºयांनाही हाच अनुभव येत असल्याने संतप्त शेतकºयांनी बाजार समिती सभापती व सचिवांच्या कार्यालयात जाऊन याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला.यावेळी शासनाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. घोषणा देत शेतकºयांनी तब्बल दीड तास तास वाहतूक रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी